नागपूर- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत दरवर्षी 31 मे हा दिवस 'जागतिक तंबाखू नकार दिन' (World No Tobacco Day) म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी 60 लाख लोकांचा तंबाखू सेवनाने मृत्यू होतो. 2030 पर्यंत ही संख्या 80 लाखांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल अडल्ट टोबॅकोचे 2016 -17 मध्ये सर्वेक्षण झाले असून, यात 15 वर्षांपासून ते वृध्दांपर्यंतचे सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालानुसार, भारतामध्ये 28.6 टक्के लोक तंबाखूचे (world no tobacco day) सेवन करतात. तर महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण 26.6 टक्के एवढे आहे. पण या व्यसनापासून मुक्त होता येते, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक देवेन्द्र पातूकर यांनी केले.
तंबाखूमुळे इतर आजार उद्भवण्याची शक्यता
तंबाखू सेवनामुळे संपूर्ण शरीरावर हानिकारक परिणाम होतात. तंबाखूजन्य पदार्थ चघळल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर होतेच पण त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊन कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, पक्षाघात, अंधत्व, श्रवणाचे आजार, पुनरुत्पादन संस्था तसेच पचनसंस्थेचे आजार, क्षयरोग इत्यादी आजार होतात.
कोरोनाच्या लढ्यात तंबाखू सोडल्यास प्रकृती सुधारण्यास फायदा