मुंबई -राज्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे, असा भ्रम कोणी निर्माण करत असेल तर ते चुकीचे आहे. राज्यात असलेल्या पारंपारिक दुष्काळी क्षेत्रात यंदाही पाणीटंचाई आहे, मात्र कुठेही तीव्र पाणीटंचाई ( Gulabrao Patil on Water scarcity ) नाही, असा दावा राज्याचे पाणीपुरवठा ( Gulabrao Patil news on water problem ) मंत्री गुलाबराव पाटील यांनी ईटीव्ही भारतशी विशेष मुलाखतीत केला.
हेही वाचा -Mumbai Drug Seized : मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या कारवाईत करोडोंचे ड्रग्ज जप्त
राज्यातील 455 गावे आणि 1 हजार 81 वाड्यावस्त्यांवर सुमारे 405 टँकरद्वारे पाणीपुरवठा ( Gulabrao Patil on drought Maharashtra ) केला जात आहे. मात्र, गतवर्षीपेक्षा ही परिस्थिती फार वेगळी नाही. गेल्या वर्षीही याच काळात राज्यात याच संख्येने टँकर धावत होते, त्यामुळे फार विषन्न परिस्थिती निर्माण झाली आहे, असे दाखवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते चुकीचे आहे, असा दावा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ( Face To Face Gulabrao Patil ) यांनी केला. राज्यातील औरंगाबाद, धुळे यासारख्या शहरांमध्ये पाणीटंचाईच्या विरोधात जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, काही पारंपरिक दुष्काळी क्षेत्रात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. तशीच ती यावर्षीही झाली आहे. याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील असून संबंधितांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासंदर्भात कार्यवाही चालू आहे. तर, नगरपालिकांच्या हद्दीतील पाणी प्रश्न हा नगर विकास विभागाकडे येत असल्याने त्याबाबत आपण बोलू इच्छित नाही, असेही गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.