महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Corona Update : रुग्ण, मृत्यूसंख्या वाढली, ५१२३ नवे रुग्ण तर १५८ जणांचा मृत्यू

आज (बुधवारी) त्यात वाढ होऊन ५१२३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोमवारी १०० मृत्यूची नोंद झाली, काल त्यात किंचित वाढ होऊन ११६ मृत्यूंची नोंद झाली होती.

By

Published : Aug 18, 2021, 9:25 PM IST

कोरोना
कोरोना

मुंबई - राज्यात गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार असून दुसरी लाट आटोक्यात येत आहे. दुसरी लाट आटोक्यात येत असताना काल (सोमवारी) ४१४५, मंगळवारी ४४०८ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज (बुधवारी) त्यात वाढ होऊन ५१२३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोमवारी १०० मृत्यूची नोंद झाली, काल त्यात किंचित वाढ होऊन ११६ मृत्यूंची नोंद झाली होती. आज त्यात आणखी वाढ होऊन १५८ मृत्यूंची नोंद झाली आहे.

८१९६ रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात गुरुवारी ८१९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,०९,३६४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९३ टक्के एवढे झाले आहे. बुधवारी राज्यात ५,१३२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३५,४१३ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१४,८९,०८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,०६,३४५ (१२.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,४६,२९० व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ५८,०६९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यूदर २.११ टक्के

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३, १२ ऑगस्टला २०८, १३ ऑगस्टला १५८, १४ ऑगस्टला १३४, १५ ऑगस्टला १३०, १६ ऑगस्टला १००, १७ ऑगस्टला ११६, १८ ऑगस्टला १५८ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.११ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

'या' विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई - २८५
रायगड - ८७
पनवेल पालिका - ५१
अहमदनगर - ६८०
पुणे - ७०१
पुणे पालिका - २९६
पिपरी चिंचवड पालिका - १७५
सोलापूर - ७५६
सातारा - ६१५
कोल्हापूर - १६६
सांगली - ३६१
सांगली मिरज कुपवाडा पालिका - ९३
सिंधुदुर्ग - ५७
रत्नागिरी - १३०
उस्मानाबाद - ४९
बीड - १०२

हेही वाचा -भाजपाने कितीही जनआशीर्वाद यात्रा काढली, तरी जनतेची तळतळाटच मिळणार - भाई जगताप

ABOUT THE AUTHOR

...view details