मुंबई -राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने त्याचा ताण आता आरोग्य यंत्रणेवर पडताना दिसून येत आहे. दररोज राज्यात सरासरी 60 हजारांच्या घरात रुग्ण सापडत आहेत. ऑक्सिजन, रेमडसिवीर इंजेक्शन याचा तुटवडा भासत आहे. यात भर पडली आहे ती म्हणजे प्लाझ्माची. कोरोना रुग्णाला बरं करण्यासाठी प्लाझ्माची गरज असते, मात्र याच प्लाझ्माचा तुटवडा मुंबईत दिसून यायला लागला आहे. मुंबईमध्ये रोज सरासरी आठ हजार रुग्ण नव्याने दाखल होत आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84 टक्के आहे. मात्र कोरोनातून बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दानासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
दररोज 400 ते 500 प्लाझ्मा दात्याची आवश्यकता
मुंबईत आतापर्यंत एकूण 4 लाख 96 हजार 263 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा हा कोरोनाबाधितांच्या उपचारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना वारंवार प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत सध्या दररोज 400 ते 500 प्लाझ्मा दात्यांची आवश्यकता आहे. मात्र त्यातील केवळ 30 ते 40 टक्केच नागरिक प्लाझ्मा देत असल्याची माहिती समोर आली आहे.
प्लाझ्मा म्हणजे काय ?