महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 5, 2022, 7:49 PM IST

ETV Bharat / city

DAY NRLM Aajeevika : उस्मानाबादच्या नवप्रभा महिला प्रभाग संघाला राष्ट्रीयस्तरावर पुरस्कार

देशाच्या पूर्व आणि पश्चिम विभागातील पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा, झारखंड, महाराष्ट्र, दमन आणि दीव, गुजरात, दादरा नगर हवेली आणि गोवा या राज्यांनी आपल्या राज्यातून प्रभाग संघाची नामांकने ( Maharashtra nomination in Prabhag Sangh ) दिली होती. राष्ट्रीयस्तरावर तीन संघांची यातून निवड करण्यात आली. या तीन पैकी नवप्रभा महिला प्रभाग संघ, लोहारा तालुक्यातील जेवळी या प्रभाग संघाला आत्मनिर्भर संघटन या पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील या उपलब्धीसाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी ( Rajesh Kumar on Prabhag Sangh ) या प्रभाग संघाचे अभिनंदन केले आहे.

वप्रभा महिला प्रभाग संघाला
वप्रभा महिला प्रभाग संघाला

मुंबई- केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान ( DAY NRLM Aajeevika ) या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावरून ‘आत्मनिर्भर संघटन’ ( Atmnirbhar Sanghatan ) या पुरस्कारासाठी देशभरातून नामांकने मागविली होती. उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे उस्मानाबाद जिल्ह्यातील नवप्रभा महिला प्रभाग संघ, लोहारा ( Navprabha Mahila Prabhag Sangh ) तालुक्यातील जेवळी या संघाचे नामांकन पटकावले आहे. ८ मार्चला महिला दिनानिमित्त संबंधित संस्थेला पुरस्कार दिला जाणार आहे.

देशाच्या पूर्व आणि पश्चिम विभागातील पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा, झारखंड, महाराष्ट्र, दमन आणि दीव, गुजरात, दादरा नगर हवेली आणि गोवा या राज्यांनी आपल्या राज्यातून प्रभाग संघाची नामांकने ( Maharashtra nomination in Prabhag Sangh ) दिली होती. राष्ट्रीयस्तरावर तीन संघांची यातून निवड करण्यात आली. या तीन पैकी नवप्रभा महिला प्रभाग संघ, लोहारा तालुक्यातील जेवळी या प्रभाग संघाला आत्मनिर्भर संघटन या पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील या उपलब्धीसाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी ( Rajesh Kumar on Prabhag Sangh ) या प्रभाग संघाचे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा-Sanjay Raut On Phone Taping Case : 'गोव्यातही शांतता! फोन टॅपिंग सुरु आहे'

पुरस्कारामुळे उमेद अभियानातील महिलांचे मनोबल वाढले आहे. या पुढील काळात अभियानाला आणि राज्यातील इतर प्रभाग संघाना हा पुरस्कार दिशादर्शक ठरेल असे मत अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आलेला जागतिक महिला दिनाच्या मुंबईतील कार्यक्रमातही या प्रभाग संघाचा विशेष सन्मान केला जाणार आहे.

हेही वाचा-Sharad Pawar in Pune : पंतप्रधान मोदी अर्धवट कामाच्या उद्घाटनासाठी पुण्यात येताहेत

पुरस्कारासाठी निवड झालेल्या नवप्रभा महिला प्रभाग संघाची स्थापना ऑक्टोबर २०१७ मध्ये करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लाहोर तालुक्यातील जेवळी प्रभागातील ७ ग्राम पंचायती आणि ९ गावांमध्ये मागास आणि वंचित घटकांचे एकूण २७५ स्वयंसहायता गटांची स्थापना केली. त्यापैकी ११ गट हे वृद्ध व्यक्तींचे असून ७ गट दिव्यांग व्यक्तींचे आहेत. तसेच स्वयंसहायता गटांचे गावपातळीवर संघटन म्हणून १२ ग्रामसंघांची स्थापना केली आहे. स्वयंसहायता गटामध्ये प्रभागातील ४ हजार ८८४ कुटुंबांपैकी ४ हजार ३६१ कुटुंबांचे समावेशन केले आहे. या कुटुंबांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ‘उमेद’ अभियानामार्फत निधी आणि समुदाय गुंतवणूक निधी कर्ज स्वरुपात दिला जातो.

हेही वाचा-Disha Salian Case : मालवणी पोलिसांसमोर राणे पिता-पुत्र हजर; जवाब नोंदवणार

ABOUT THE AUTHOR

...view details