महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 16, 2022, 3:59 PM IST

Updated : Jun 16, 2022, 4:04 PM IST

ETV Bharat / city

Mumbai Congress Morcha : राजभवन परिसरात काँग्रेसचा महामोर्चा; नाना पटोले म्हणाले, हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लढेंगे

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या निषेधार्थ मुंबई कॉंग्रेस तर्फे सलग चौथ्या दिवशी निदर्शने सुरु आहेत. आज दक्षिण मुंबईतील हँगिंग गार्डन पासून राजभवनपर्यंत काँग्रेसने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ( Mumbai Congress Morcha at Raj Bhavan area in Mumbai ) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

Mumbai Congress Morcha
राजभवन परिसरात काँग्रेसचा महामोर्चा

मुंबई - कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या निषेधार्थ मुंबई कॉंग्रेसतर्फे सलग चौथ्या दिवशी निदर्शने सुरु आहेत. आज दक्षिण मुंबईतील हँगिंग गार्डन पासून राजभवनपर्यंत काँग्रेसने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ( Mumbai Congress Morcha at Raj Bhavan area in Mumbai ) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुंबई शहराध्यक्ष भाई जगताप यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सामील झाले होते.

राजभवन परिसरात काँग्रेसचा महामोर्चा

कारवाई सूडबुद्धीने - या प्रसंगी बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच गांधी परिवार यांच्यावर मोदी सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये पोलिसांना पाठवून लाठीचार्ज करणे, तटबंदी करणे, तसेच हुकूमशाही व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. याचा तीव्र निषेध म्हणून हे आंदोलन होत आहे.

हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लढेंगे - याप्रसंगी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशात २०१४ पासून आणीबाणी सुरू झाली आहे. मागील ८ वर्षात देशाला मान खाली घालण्यासाठी ठरवून उपाययोजना करण्यात आली आहे. आज रुपया कधी नव्हे इतका खाली घसरला आहे. भारताला इतर देशांची माफी मागावी लागत आहे. परंतु या परिस्थितीमध्ये सुद्धा केंद्र सरकारशी दोन हात करून जनतेचे प्रश्न मांडले म्हणून राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. परंतु त्यांनी सांगितले आहे, हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लढेंगे. आज राज्यपाल भवनावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. लोकशाही सोडून हुकूमशाही देशात सुरू आहे. इंग्रज कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस ब्रिटिशांशी लढली व आता काँग्रेस मोदी विरोधात लढत आहे. ही लढाई रस्त्यावर लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्या इशाऱ्यावर काम करते याचा पुरावा द्यायची गरज नाही. सत्तेची गर्मी व गुर्मी भाजपला झाली आहे. राज्यातील नेते बोलतात ईडी उद्या लागेल व लागते, असं सांगत ही सुड भावनेच्या पोटी जाणीवपूर्वक कारवाई केली जात आहे, असे नाना पटोले म्हणाले.

'ही' कारवाई सामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी -याप्रसंगी बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, आज देशात महागाई फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. भ्रष्टाचार वाढलेला आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे. मोदी सरकार या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाणून-बुजून गांधी परिवारावर ईडीतर्फे कारवाई करत आहे. ही कारवाई करून महत्त्वाच्या प्रश्नावरून सामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी करण्यात येत आहे.

राजभवनला छावणीचे स्वरूप -काँग्रेसच्या या आंदोलनामध्ये हजारो कार्यकर्ते सामील झालेले आहेत. त्या कारणास्तव हा मोर्चा राजभवन येथे धडकणार असल्याकारणाने राजभवनापासून काही अंतरावर पोलिसांनी रस्ता बंद केला आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे.

हेही वाचा -10th Exam Result : दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार, 'येथे' पाहा निकाल

Last Updated : Jun 16, 2022, 4:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details