मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय गोंधळानंतर ( political turmoil in Maharashtra ) मुंबईतील राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS president Raj Thackeray ) यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मनसेचा मेळावा 13 जुलै रोजी वांद्रे येथील रंगशारदा हॉलमध्ये ( Rangsharda Hall in Bandra ) होणार होता. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र जारी करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. राज ठाकरे यांनीही कार्यकर्त्यांना पत्र लिहून हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे.
पुढची तारीख लवकरच ठरवली जाईल-मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray letter to party workers ) यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, १३ जुलैला रॅली होणार होती. ज्यामध्ये मला तुमच्याशी बोलायचे होते आणि कामाबाबत काही सूचना द्यायची होती. मात्र, कालपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. सार्वजनिक जीवन व्यस्त आहे, त्यामुळे सभा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख लवकरच ठरवली जाईल, त्यामुळे तुम्हा सर्वांना कळवण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले आहे.
पुढची तारीख लवकरच सांगितली जाईल-'तुम्हाला जरा थोड्या तातडीनं कळवतो आहे. आपण वास्तविक उद्या एक मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होते. कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाने थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन तर विस्कळीत आहेच, परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो. तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणे फार अवघड आहे. अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच, थोडा पावसाचा अंदाज घेऊन, तुम्हा सर्वांना कळवली जाईलच.
स्वतःची काळजी घ्या-'तुम्ही स्वत:ची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे. तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यत: नदीकाठाला जिथे लोक रहात
आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी बुसण्याची सण्याची शक्यता आहे. सांगली- कोल्हापूरकडचा आत्ता-आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकते. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुध्द पाणी, अंथरूण-पांघरूण पुरवावे लागेल. मुख्यत: वृध्द, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडे उन्मळून पडतात, ती नंतर पुन्हा लावावी लागतील. अशा खूप गोष्टी आहेत. एक लक्षात घ्या की अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करू नका. अर्थात, असं काही होऊ नये, कुठलंही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे, फक्त सतर्कतेसाठी सांगितलं. लवकरच भेटू.' दरम्यान, भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. राज्याची राजधानी मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.