Ranchi:होळीच्या दिवशी जेव्हा राजकारण्यांची चर्चा होते तेव्हा त्यात लालूप्रसाद यादव यांची चर्चा नक्कीच होते. मात्र, लालुप्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरले आहेत. दरम्यान, त्यांच्यावर रांची येथील रिम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. काल सर्वत्र होळी साजरी झाली. मात्र, लालूकडे कोणी भेटण्यासाठी आले नाही. मात्र, तब्येत खराब असल्याने त्यांना या वर्षीची होळी साजरी करता आली नाही. तसेच, डॉक्टरांनीही त्यांच्यावर काही निर्बंध घातले आहेत.
अनेक लोक या उत्सवात भाग घेण्यासाठी त्यांच्या घरी येतात
लालू यांच्या आयुष्यात रंगांचा सण होळीला विशेष महत्त्व आहे. ते दरवर्षी पाटणा येथील त्यांच्या निवासस्थानी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह अनेक लोक या उत्सवात भाग घेण्यासाठी त्यांच्या घरी येतात. मात्र, यावेळी चारा घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर त्यांना हा उत्सव साजरा करता आला नाही.
कॉल करण्यासंबंधी कोणताही अर्ज प्राप्त झाला नाही
लालू प्रसाद यादव यांना रिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. शुक्रवार (दि. 18 मार्च)रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत रिम्सच्या पेइंग वॉर्डाबाहेर पाहुण्यांची हालचाल नव्हती. बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंग अधीक्षक हमीद अख्तर यांनी ईटीव्ही भारत'ला फोनवर सांगितले, की लालू यादव यांना कॉल करण्यासंबंधी कोणताही अर्ज प्राप्त झाला नाही. वास्तविक, लालू यादव यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस दलाकडे पाहुण्यांचे अर्ज सादर केले जातात.