महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

निवडणूक काळात 'एक्झिट पोल' जाहीर करण्यास निवडणूक आयोगाची मनाई

विधानसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारच्या चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. तसेच मतदान संपण्याच्यापूर्वी अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे जनमत चाचण्यांचे अंदाज (ओपेनियन पोल) जाहीर करण्यावरही मनाई करण्यात आली आहे.

By

Published : Oct 16, 2019, 10:32 PM IST

विधानसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारच्या चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मनाई केली आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारच्या चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. तसेच मतदान संपण्याच्यापूर्वी अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे जनमत चाचण्यांचे अंदाज (ओपेनियन पोल) जाहीर करण्यावरही मनाई करण्यात आली आहे.

राज्यात दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे काही लोकसभा मतदारसंघांच्या पोट निवडणुकीचसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर दि.21 ऑक्टोबरला सकाळी 7 ते सायं 6.30 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या अंदाज चाचण्यांचे सर्वेक्षण आयोजित करण्यास तसेच वृत्तपत्रांसह इलेक्ट्रॉनिक माध्यमे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

तसेच मतदान समाप्तीच्या वेळेआधी 48 तास कोणत्याही जनमत चाचणीचे अंदाज (ओपिनियन पोल) किंवा अन्य कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाचे अंदाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्ध करता येणार नाहीत, असेही भारत निवडणूक आयोगामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details