महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 12, 2020, 3:02 PM IST

Updated : Dec 12, 2020, 3:17 PM IST

ETV Bharat / city

औरंगाबादचा पाणीप्रश्न लवकरच सोडवू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अनेक योजनांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आज औरंगाबादमध्ये आले आहेत.

cm
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. 1 मे रोजी नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग सुरू करणार आहेत. तसेच येत्या काळात औरंगाबादमधला पाणीप्रश्न लवकरच सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादकराना दिले आहे. अनेक योजनांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आज औरंगाबादमध्ये आले आहेत.

नागपूर ते शिर्डी महामार्ग 1 मेला सुरू होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात समृद्धी महामार्गाच्या कामांची पाहणी केली. येत्या 1 मे 2021 ला नागपूर ते शिर्डीपर्यंतचा मार्ग सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये केली आहे. हा महामार्ग सुरू झाल्यानंतर औरंगाबादचे महत्तव वाढणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Dec 12, 2020, 3:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details