मुंबई- अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असल्याचा केंद्र सरकारने वेळोवेळी दावा केला आहे. मात्र, जनतेत अर्थव्यवस्थेसह रोजगार वाढण्यावरील विश्वास कमी होत चालला आहे. ही माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) सर्व्हेमधून समोर आली आहे.
येत्या जुलै २०१९ मध्ये उत्पन्न वाढण्याबाबत देशातील जनता कमी आशावादी असल्याचे आरबीआयच्या ग्राहक विश्वास (कन्झ्युमअर कॉन्फिडन्स) सर्व्हेमधून दिसून आले आहे. रोजगाराबाबत ५२ टक्के लोकांनी परिस्थिती अधिक वाईट झाल्याचे मत व्यक्त केले आहे. तर २८ टक्के लोकांनी रोजगाराची स्थिती सुधारल्याचे म्हटले आहे. तर १९.५ टक्के लोकांनी स्थिती 'जैसे थे' राहिल्याचे म्हटले आहे. ग्राहकांचा विश्वास गेल्या सहा वर्षात सर्वात कमी होवून सप्टेंबरमध्ये ८९.४ नोंदविण्यात आला. रोजगार, उत्पन्न आणि पर्यायी खर्चाबाबत जनतेने प्रतिकूल मत व्यक्त केले आहे.
हेही वाचा-सणासुदीला ग्राहकांना दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी कपात