नवी दिल्ली- कोरोना महामारीमुळे देशातील बेरोजगारीचे प्रमाण सतत वाढत आहे. सेंटर फॉर मॉनरटिंग इंडियन मॉनिटरटिंगने (सीएमआयई) २४ मेअखेरीच्या अहवालात बेरोजगारीचा प्रमाण २४.३ टक्के राहिल्याचे म्हटले आहे. त्यापूर्वीच्या आठवड्यात बेरोजगारीचे प्रमाण होते.
टाळेबंदीच्या आठ आठवड्यात बेरोजगारीचे सरासरी प्रमाण हे २४.२ टक्के राहिले आहे. हे प्रमाण आणखी वाढत आहे. मार्चमधील बेरोजगारीचे प्रमाण हे ८.८ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये २३.५ टक्के झाले आहे. हे बेरोजगारीचे प्रमाण मेमध्ये २४ टक्के स्थिर राहिले. त्यानंतर मे महिन्यात पुन्हा बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.