नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरत असल्याचे चिन्हे दिसत आहेत. देशातील उत्पादनांच्या निर्यातीत मार्चमध्ये १७.२७ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात १ मार्च ते १४ मार्चदरम्यान १४.२२ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे.
देशात १ मार्च ते १४ मार्च दरम्यान आयातीचे प्रमाण हे २७.७७ टक्क्यांनी वाढून २२.२४ अब्ज डॉलर आहे. तर व्यापारी तूट ही ८.०२ अब्ज डॉलर आहे. अभियांत्रिकी, तांदूळ, रत्नजडित खडे आणि मौल्यवान दागिने यांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. असे असले तरी कातडी उत्पादने, तेलबिया, रेडीमेड गारमेंट आणि वस्त्रोद्योग यांच्या उत्पादनात घसरण झाली आहे. सोने, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, मोती आणि मौल्यवान खड्यांच्या आयातीत वाढ झाली आहे.