नवी दिल्ली - ई-सिगरेट आणि तशा उत्पादनांवर पूर्णपणे बंदी लागू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची शिखर संघटना एफएआयएफएने केली आहे. ई-सिगरटेने तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांवर भयानक परिणाम होईल, अशी भीतीही संघटनेने व्यक्त केली आहे.
द फेडरेशन ऑफ ऑल इंडिया फार्मर असोसिएशन्सने (एफएआयएफए) आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरातमधील नगदी पिक उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करते. सध्या सिगरेटसाठी देशाबाहेर उत्पादन घेणाऱ्या तंबाखूमधील निकोटिनचा वापर करण्यात येतो. तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांचा नव्या पिढीतील ई-सिगरेटसारख्या उत्पादनांना विरोध आहे. ई-सिगरेटच्या वाढत्या वापराने त्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होण्याची भीती आहे.