नवी दिल्ली - मोदी सरकारविरोधात विरोधकांची फळी एकजूट होत आहे. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राजकीय हेतुसाठी हे भेट झाल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी माध्यमांसी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की मी शरद पवारांशी बोलले. ही भेट यशस्वी झाली आहे. आम्ही राजकीय हेतुसाठी भेटलो. लोकशाही टिकली पाहिजे. लोकशाही वाचवा, देश वाचवा, अशी आमची घोषणा आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या मुद्द्यांनाही पाठिंबा देत आहोत. दर दोन महिन्यांनी आम्ही भेटणार आहोत.
हेही वाचा-30 जुलै राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज पोटाचा त्रास जाणवेल; जाणून घ्या बाकी राशींचे भविष्य
भेट होणार असल्याची शरद पवारांनी मुंबईत दिली होती माहिती-
मुंबईत माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले होते, की ममता बॅनर्जी यांनी मागील आठवड्यात फोन केला होता. त्यांनी दिल्ली दौऱ्याची माहिती दिली. तसेच मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. उद्या, दिल्लीत आमची भेट होऊ शकते, असे मला वाटते.