महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 22, 2021, 6:57 PM IST

ETV Bharat / bharat

इंधन दरवाढीवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

नोटाबंदीमुळे, जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कमुकवत असलेल्या अर्थव्यवस्थला कोरोनाचा फटका बसला. सरकारकडे पैसे नाहीत. सरकारल पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवून तुमच्या खिशातून पैसे घेत आहेत, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी
राहुल गांधी

कोची - इंधनाच्या किंमती वाढल्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केंद्रातील भाजपाप्रणीत सरकारवर जोरदार टीका केली. सरकार लोकांच्या खिशातून पैसे घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वायत्त महिला महाविद्यालयाच्या सेंट टेरेसा कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गांधींनी अर्थव्यवस्था कोलमडल्याबद्दल सरकारच्या गैरकारभारावर टीका केली.

नोटाबंदीमुळे, जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कमुकवत असलेल्या अर्थव्यवस्थला कोरोनाचा फटका बसला. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. आता सरकारकडे पैसे नाहीत. सरकारल पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवून तुमच्या खिशातून पैसे घेत आहेत, असे गांधी म्हणाले. तसेच टि्वट करून देश बेरोजगारीपासून आझादी मागत असल्याचे त्यांनी म्हटलं.

देश विकून मित्रांचा फायदा -

राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर, 'हम दो..हमारे दो' अशी घोषणाबाजी करत हल्लाबोल करत आहेत. मोदी हे अदानी आणि अंबानी यांना झुकतं माप देतातं, असा आरोपही राहुल यांनी केला आहे. केंद्र सरकार दिवसाढवळ्या दोन्ही हातानी लूटमार करत असून गॅस-डिजल-पेट्रोलवर मोठ्याप्रमाणेत करवसूली केली जाते. तसेच पब्लिक सेक्टर बँका मित्रांना विकल्या जात आहेत. देश विकून मित्रांचा फायदा मोदी करत आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details