महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 29, 2022, 11:27 AM IST

Updated : Apr 29, 2022, 12:09 PM IST

ETV Bharat / bharat

Non Muslim village In Bihar : हा खरा भारत! गावात एकही मुस्लीम नसताना रोज होते नमाज

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील माडी गावात मशीद आणि कबर पाहून बाहेरून येणाऱ्या लोकांना आश्यर्य वाटते. कारण त्यांना वाटते या गावात मुस्लिमांची चांगली लोकसंख्या असेल, (Mari Village where no Muslim lives) रोज वेळेवर अजान होत असेल. मात्र, माडी गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही. परंतु, रोज नमाज पडतो आणि सर्व देखरेखही घेतली जाते.

गावात एकही मुस्लीम नसताना रोज होते नमाज
गावात एकही मुस्लीम नसताना रोज होते नमाज

नालंदा - देशात अनेक वेळा हिंदू-मुस्लिम यांच्यातील जातीय तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून भोंगे हटवण्यापासून देशभरात वातावरण ढवळून निघाले आहे. काही ठिकाणी दंगली भडकवल्या जात आहेत. मात्र, भारत विविधतेने नटलेला आणि विविधता जपणारा, त्याचा आदर करणारा देश आहे हे वारंवार सिद्ध झालेले आहे. अशीच घटना आहे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील एका गावची. येथील गावात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे मोठे उदाहरण आपल्या समोर ठेवले आहे. (Mari Village In Bihar) येथील गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही, पण इथल्या एका मशिदीत रोज पाच वेळा नमाज अदा केली जाते आणि अजानही ​​दिली जाते हे आहेना आश्चर्य वाटण्यासारखेच -

गावात एकही मुस्लीम नसताना रोज होते नमाज

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बेन ब्लॉकमधील माडी गावात फक्त हिंदू समाजाचे लोक राहतात. इथे एक मशीद आहे. तेव्हडेच नाही तर कुणीही मुस्लिम नसताना ही मशीद काही दुर्लक्षित झालेली नाही. परंतु, हिंदू समाज तिची योग्य काळजी घेतो. येथे पाचवेळा नमाज अदा करण्याची व्यवस्था आहे. (Hindus Take Care of Mosque in Nalanda) मशिदीची देखभाल, रंगरंगोटी आणि रंगकामाची जबाबदारीही हिंदूंनी उचलली आहे. गावात राहणारे हिंदू धर्माचे लोक बिनदिक्कतपणे आपल्या मंदिराप्रमाणे मशिदीची काळजी घेत आहेत.

मशिदीच्या स्वच्छतेची जबाबदारीगावातीलच बखोरी जमादार, गौतम प्रसाद आणि अजय पासवान यांच्यावर आहे. मशिदीमध्ये नियमानुसार साफसफाई, दुरुस्तीसोबतच रोज अजान दिली जाते. अजान न शिकल्यामुळे हिंदू धर्माच्या लोकांनी यावरही उपाय शोधला. या लोकांनी रेकॉर्डेड आजान देण्याची पद्दत समोर आणली आहे. या मशिदीत दररोज पाच वेळा अजान होते. मशिदीचे रंगरंगोटी असो वा बांधकाम असो, यात गावातील लोक कायम सहकार्य करतात.

इतकेच नाही तर गावातील हिंदू धर्माचे लोकही कोणत्याही शुभ कार्यापूर्वी येथे येतात. लग्नानिमित्त हिंदू देवदेवतांच्या मंदिरात ज्या पद्धतीने कार्ड पाठवले जाते, त्याचप्रमाणे येथेही कार्ड पाठवले जाते. असे न करणाऱ्यांना त्रास होईल, असे मानले जाते. शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा लोक पाळत आहेत. एवढेच नाही तर गावातील एखाद्याला गालाचा आजार झाल्यानंतर या मशिदीत ठेवलेल्या दगडाला चिकटवल्याने हा आजार बरा होतो, असे गावकरी सांगतात. मशिदीच्या आत एक कबर देखील आहे. यावरही लोक चादर-कपडे करतात.

गावकऱ्यांचे म्हणणे आहेकी, काही वर्षांपूर्वी येथे मुस्लिम कुटुंबे राहत होती. परंतु, हळूहळू ते स्थलांतरित झाले आणि त्यांची मशीद या गावात राहिली आहे. त्यानंतर हिंदू धर्माच्या लोकांनी मशिदीच्या देखभालीची जबाबदारी घेतली. गावातील बखोरी जमादार गौतम प्रसाद आणि अजय पासवान यांनी मिळून मशिदीची काळजी घ्यायला सुरुवात केली. या गावात आज सुमारे 2000 लोकसंख्या असून सर्व हिंदू धर्माचे लोक आहेत. या मशिदीची देखरेख (1981)पासून हिंदू लोकच करत आहेत.

हेही वाचा -SemiconIndia Conference : पंतप्रधान बेंगळुरूमध्ये 'सेमिकॉनइंडिया परिषदे'चे उद्घाटन करणार

Last Updated : Apr 29, 2022, 12:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details