महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mangal Prabhat Lodha : मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राजस्थानात घेतली मृतक कन्हैयालालच्या कुटुंबियांची भेट

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उदयपूरमध्ये कन्हैयालालच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या पैंगबरावरील वादग्रस्त वक्तव्याचे कन्हैयालाल यांनी सोशल मीडियावर समर्थन केले होते. त्यानंतर कट्टरवाद्यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून 28 जून 2022 रोजी कन्हैयालाल यांची त्यांच्या दुकानात घुसून त्यांची निर्घृण हत्या केली होती. त्यांनी या हत्येचा व्हिडिओ देखील व्हायरल केला होता.

By

Published : Jan 15, 2023, 10:33 PM IST

Mangal Prabhat Lodha
मंगल प्रभात लोढा

मंगल प्रभात लोढा यांनी घेतली कन्हैयालालच्या कुटुंबियांची भेट

उदयपूर (राजस्थान) : महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रविवारी राजस्थानातील उदयपूर येथे कन्हैयालाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आर्थिक मदत केली. यादरम्यान, ईटीव्ही भारतशी विशेष संवाद साधताना मंत्री म्हणाले की, हे अत्यंत घृणास्पद हत्याकांड आहे. या हत्याकांडानंतर एका हसऱ्या कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला. उदयपूरच्या घटनेत कन्हैयालालच्या कुटुंबाचा कोणताही दोष नसल्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. नुसती सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्याला कोणी एवढ्या क्रूरतेने मारेल याची कल्पनाही करू शकत नाही. समाजातील प्रत्येक व्यक्ती या निर्दयी खून प्रकरणाचा तीव्र निषेध करतो.

मंगल प्रभात लोढा यांनी घेतली कन्हैयालालच्या कुटुंबियांची भेट

हत्येने कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला :कुटुंबाला भेटताना नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या वेदना शब्दात सांगता येणार नाहीत, असे पर्यटनमंत्र्यांनी सांगितले. कन्हैयाच्या कुटुंबात लहान मुले आहेत. त्यांची पत्नी अजूनही या वेदनातून बाहेर पडू शकलेली नाही. केंद्र सरकार आणि एनआयएची टीम या प्रकरणाच्या तपासात गुंतलेली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रत्येकाने सतर्क राहावे.

मंगल प्रभात लोढा यांनी घेतली कन्हैयालालच्या कुटुंबियांची भेट

कन्हैयालालची निर्घृण हत्या : ते म्हणाले की, कन्हैयालाल हे अत्यंत साध्या कुटुंबातील होते. त्यांचे टेलरिंगचे छोटेसे दुकान होते. मंत्र्यांनी सांगितले की, कन्हैयालालची अशा प्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली की लोकांमध्ये दहशत पसरवली जाईल. ही घटना घडवून आणणाऱ्या नराधमांनी या घटनेचा व्हिडीओ बनवून स्वतःला तीस मार खान असल्याचे सिद्ध करण्यासाठी अशी घटना घडवून आणली.

कन्हैयाचा मुलगा यश यालाही समजावले : कन्हैयालालचा मुलगा यश याने आपल्या वडिलांच्या मृत्यूपासून मारेकऱ्यांना फाशी होईपर्यंत अनवाणीच राहण्याची शपथ घेतली आहे. या कडाक्याच्या थंडीत कन्हैयाचा मुलगा यश अनवाणी आपले काम करत आहे. याबाबत मंत्री म्हणाले की, या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठीचा लढा मोठा आहे.

महाराष्ट्र आणि राजस्थानकडे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कसे पाहतात :महाराष्ट्राच्या पर्यटनमंत्र्यांनाही उदयपूरचे सौंदर्य आणि येथील निळे तलाव पाहण्याची खूप आवड होती. ते म्हणाले की, उदयपूरकडून पर्यटनाच्या बाबतीत खूप काही शिकता येईल. उदयपूर अतिशय सुंदर बांधलेले शहर आहे.

राजस्थानमध्ये भाजपचे डबल इंजिन सरकार स्थापन होणार :यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, आगामी काळात राजस्थानमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. देशात आणि राज्यात डबल इंजिन सरकार चालेल. पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवणारे लोक भाजपला सत्तेत आणतील. ते म्हणाले की, राजस्थानमध्ये विकास आणि रोजगाराची नितांत गरज आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असेल तर विकासाचा वेग आणखी वाढेल.

काय संपूर्ण प्रकरण? : 28 जून रोजी मारेकरी उदयपूर शहरातील मालदास स्ट्रीट येथील भूत महल गल्लीतील कन्हैयालालच्या दुकानात घुसले आणि त्यांची हत्या केली. मारेकरी रियाज आणि गौस मोहम्मद कपडे शिवण्याच्या बहाण्याने दुकानात घुसले होते. यादरम्यान कन्हैयाने माप घेण्यास सुरुवात केली असता आरोपींनी त्याच्यावर वस्तरा आणि चाकूने हल्ला केला. ज्यात कन्हैयाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात, UAPA व्यतिरिक्त कलम 452, 302, 153A, 153B, 295 A आणि 34 अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी हत्येचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केला.

हेही वाचा :Kanhaiyalal Murder Case : 177 दिवसांनंतर कोर्टात चार्जशीट सादर, मुलगा म्हणाला, "मारेकऱ्यांना भरचौकात फाशी द्या"

ABOUT THE AUTHOR

...view details