पुद्दुचेरी - विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांच्या नेतृत्वातील पुद्दुचेरीमधील काँग्रेस सरकार कोसळले आहे. प्रदेशात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी नायब राज्यपाल तामिलीसाई सौंदराराजन यांनी आज गृहमंत्रालयाकडे केली आहे.
पुद्दुचेरी विधानसभेत 22 फेब्रुवरीला काँग्रेसचे सरकार बहूमत गमवल्यामुळे कोसळले. मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांनी राजीनामा दिला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नारायणसामी यांच्यासह त्यांच्या मंत्रीमंडळाचा राजीनामा स्वीकारला. आमदारांनी राजीमाना दिल्याने काँग्रेस सरकारकडे 11 तर विरोधकांकडे 14 असे संख्याबळ होते.
माजी नायब राज्यपाल किरण बेदी आणि केंद्र सरकारने विरोधकांसोबत हातमिळवणी करत सरकार पाडले. हे कृत्य म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, अशी प्रतिक्रिया नारायनसामी यांनी दिली होती.