महाराष्ट्र

maharashtra

पुद्दुचेरीत राष्ट्रपती शासन लागू करा - तामिलीसाई सौंदराराजन

By

Published : Feb 24, 2021, 4:48 PM IST

पुद्दुचेरीत राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी नायब राज्यपाल तामिलीसाई सौंदराराजन यांनी आज गृहमंत्रालयाकडे केली आहे. पुद्दुचेरी विधानसभेत 22 फेब्रुवरीला काँग्रेसचे सरकार बहूमत गमवल्यामुळे कोसळले.

तामिलीसाई सौंदराराजन
तामिलीसाई सौंदराराजन

पुद्दुचेरी - विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांच्या नेतृत्वातील पुद्दुचेरीमधील काँग्रेस सरकार कोसळले आहे. प्रदेशात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी नायब राज्यपाल तामिलीसाई सौंदराराजन यांनी आज गृहमंत्रालयाकडे केली आहे.

पुद्दुचेरी विधानसभेत 22 फेब्रुवरीला काँग्रेसचे सरकार बहूमत गमवल्यामुळे कोसळले. मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांनी राजीनामा दिला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नारायणसामी यांच्यासह त्यांच्या मंत्रीमंडळाचा राजीनामा स्वीकारला. आमदारांनी राजीमाना दिल्याने काँग्रेस सरकारकडे 11 तर विरोधकांकडे 14 असे संख्याबळ होते.

माजी नायब राज्यपाल किरण बेदी आणि केंद्र सरकारने विरोधकांसोबत हातमिळवणी करत सरकार पाडले. हे कृत्य म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, अशी प्रतिक्रिया नारायनसामी यांनी दिली होती.

पुद्दुचेरी हे केंद्रशासित आणि लहान राज्य आहे. 30 निर्वाचित आमदार आणि तीन नामनिर्देशित आमदार मिळून 33 आमदारांची विधानसभा आहे. भारतीय जनता पक्षाने हे छोटे राज्य काँग्रेसकडून खेचून घेतले आहे. पुद्दुचेरीतील काँग्रेसचे सरकार कोसळले आहे. 11 विरोधात 14 अशा फरकाने नारायणसामींचे सरकार बहुमत चाचणीत अपयशी ठरले.

पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक -

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळविला होता. तर काँग्रेसचा सहकारी असलेल्या डीएमकेने 3 जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष आमदारानेही त्यांना पाठिंबा दिला होता. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा 16 आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details