महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 21, 2022, 1:40 PM IST

ETV Bharat / bharat

Narak Chaturdashi : अरुणोदय काळात उटने लावल्यास चकाकणार सौंदर्य, जाणुन घ्या महत्व

दिवाळीच्या एक दिवस आधी नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) साजरी केली जाते. याला रूप चौदस किंवा रूप चतुर्दशी असेही म्हणतात. दिव्यासोबतच या दिवशी विशेष उटने लावण्याची मान्यता आहे. जाणून घ्या काय आहे त्यामागील श्रद्धा आणि श्रीकृष्णाशी (Lord Shrikrishna) या दिवसाचा संबंध.

Narak Chaturdashi
नरक चतुर्दशी

बिकानेर : कार्तिक कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी आणि दीपावलीच्या एक दिवस आधी साजऱ्या होणाऱ्या सणाला छोटी दिवाळी किंवा नरक चतुर्दशी असेही म्हणतात. नरक चतुर्दशीचे महत्त्व सांगताना पंडित राजेंद्र किरडू सांगतात की, या दिवशी यमराजला प्रसन्न (importance of yamraj puja) ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाते.

चारमुखी दिवा : या दिवशी यमराजला प्रसन्न ठेवण्यासाठी घराबाहेर पिठाचाचारमुखी दिवा लावण्याची परंपरा आहे. पंडित किराडू म्हणतात की, यामुळे यमराजाची कृपा राहते आणि कुटुंबातील सदस्यांचा अकाली मृत्यू होत नाही. धर्मशास्त्रज्ञांच्या मते, अरुणोदय काळात उटनं लावल्यास सौंदर्य चकाकते.

नरक चतुर्दशीला रूप चतुर्दशी का म्हणतात : एका पौराणिक मान्यतेनुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून देव आणि ऋषींना त्याच्या दहशतीतून मुक्त केले. कृष्ण देवाने सुमारे 16 हजार 100 महिलांची मुक्तता करून त्यांना पत्नीचा दर्जा दिला. नवे आयुष्य, नवी ओळख मिळाल्यानंतर रूप चतुर्दशीला स्वत:ला सजवण्याची परंपरा सुरू झाली, असे म्हणतात. मोहरीच्या तेलाची मसाज केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी ज्या स्त्रिया अंगावर उटनं आणि मोहरीचे तेल लावतात त्यांना श्रीकृष्णाची पत्नी रुक्मणी देवीची कृपा प्राप्त होते आणि सौभाग्यामध्ये प्राप्त होते.

उबटनाचे विशेष महत्त्व : पंडित राजेंद्र किराडू म्हणतात की, रूप चतुर्दशीला सकाळच्या आधी म्हणजेच अरुणोदय काळात उटनं लावावे. लग्नाच्या वेळी हळदीच्या समारंभात वधू-वरांना ज्याप्रकारे हळद लावली जाते, त्याचप्रमाणे रूप चतुर्दशीला उटनं, चंदन, सुगंधी द्रव्य, आणि गुलाबपाणी मिसळून अंगावर लावले जाते. असे म्हणतात की, यामुळे यमराजही प्रसन्न होतात. जो मनुष्य या दिवशी नियमानुसार पूजा करतो आणि तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि त्याला स्वर्ग प्राप्त होतो. संध्याकाळी यमराजासाठी दीपदान करण्याची प्रथा आहे. याशिवाय यमराजाच्या नावाने दीप प्रज्वलित करून, यमाप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी रूप चतुर्दशीचा सण भारतभर साजरा केला जातो.

नरक चतुर्दशीच्या पूजेची पद्धत : शास्त्रानुसार या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे. प्रथेनुसार यमराज, श्री कृष्ण, काली माता, भगवान शिव, हनुमानजी आणि विष्णूजींंच्या वामन स्वरूपाची विशेष पूजा केली जाते. या सर्व देवतांच्या मूर्ती घराच्या ईशान्य कोपर्‍यात स्थापित करून; त्यांची यथासांग पूजा करावी. देवतांच्या समोर धूप-दिवा लावा, कुंकुम तिलक लावा आणि मंत्रांचा उच्चार करा. असे मानले जाते की, यमदेवाची पूजा केल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते आणि सर्व पापांचा नाश होतो, म्हणून संध्याकाळी यमदेवाची पूजा करून, घराच्या दाराच्या दोन्ही बाजूला दिवा लावावा.Narak Chaturdashi. importance of yamraj puja

ABOUT THE AUTHOR

...view details