बेळगाव (कर्नाटक) :कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( CM Basavaraja Bommai ) यांनी बुधवारी सांगितले की, महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते विधानसभेच्या आत आणि बाहेर जे वक्तव्य करत आहेत त्यावरून त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. बोम्मई यांनी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातील विरोधी पक्ष कर्नाटकसोबतच्या सीमावादाचे ( Maharashtra Karnataka Border Dispute ) राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. याआधी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सीमाप्रश्नावरून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्यांच्या प्रयत्नात अपयशी ठरले. दोन्ही राज्यातील जनता एकोपा राखत असताना, हे नेते मोठ्या प्रमाणात कर्नाटकात दाखल होत आहेत. ( Basavaraja Bommai Give Tong To Maharashtra leaders )
प्रश्न रस्त्यावर सुटत नाही :यापूर्वीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला असून तो अपयशी ठरला आहे. आताही ते अपयशी ठरतात. दोन्ही बाजूंनी शांतता व सुव्यवस्था राखून बसेस सुरळीत सुरू असताना या सर्वांनी मंगळवारी सीमेवर पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना लोकांचा पाठिंबा मिळाला नाही. ते राजकीय पक्षांचे झेंडे घेऊन आले होते आणि बघितले तर ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसते.आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांशी आधीच बोललो आहोत. हा प्रश्न रस्त्यावर सुटत नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले पाहिजे.