महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 6, 2022, 9:44 AM IST

ETV Bharat / bharat

देशात बेरोजगारी वाढली.. बेरोजगारीचा दर 7.80 टक्क्यांवर : CMIE

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी ( Centre for Monitoring Indian Economy ) या आर्थिक संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये शहरी भागात बेरोजगारीचा दर 7.3 टक्के नोंदवला गेला, तर ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर 8.03 टक्के ( Unemployment rate rises in June ) झाला. आकडेवारीनुसार, बेरोजगारीचा सर्वाधिक दर हरियाणात 30.6 टक्के होता.

UNEMPLOYMENT
बेरोजगारी

मुंबई : जूनमध्ये देशातील बेरोजगारीचा दर 7.80 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात, विशेषत: कृषी क्षेत्रातील १.३ कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या, त्यामुळे बेरोजगारी वाढली ( Unemployment rate rises in June ) आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी ( Centre for Monitoring Indian Economy ) या आर्थिक संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर जूनमध्ये 8.03 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो मेमध्ये 7.30 टक्क्यांवर होता. शहरी भागात, परिस्थिती थोडी बरी होती आणि बेरोजगारीचा दर 7.3 टक्के नोंदवला गेला, जो मे मध्ये 7.12 टक्के होता.

खेड्यांमधील कामे मंदावली :सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास म्हणाले, “लॉकडाऊनशिवाय या महिन्यातील रोजगारातील एवढी मोठी घट आहे. हे प्रामुख्याने खेड्यांमध्ये असते आणि हंगामी असते. खेड्यापाड्यातील कृषी क्षेत्रातील कामे मंदावलेली आहेत आणि जुलैमध्ये पेरणी सुरू झाल्याने परिस्थिती बदलण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले की, जून महिन्यात 1.3 कोटी नोकऱ्या कमी झाल्या, पण बेरोजगारी केवळ 30 लाखांनी वाढली. व्यास म्हणाले की, इतर कामगार लेबर मार्केटमधून बाहेर पडले आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये एक कोटींची कपात झाली.

असंघटित क्षेत्रात कमतरता :ही कमतरता प्रामुख्याने असंघटित क्षेत्रात झाल्याचे ते म्हणाले. ही बहुधा श्रमिक स्थलांतराची बाब आहे आणि आर्थिक मंदीची नाही. व्यास म्हणाले, 'एवढ्या मोठ्या संख्येने कामगारांना पावसाळ्याचा फटका बसणे चिंताजनक आहे.' ते म्हणाले की, दुसरा चिंताजनक आकडा म्हणजे जून 2022 मध्ये पगारदार कर्मचाऱ्यांच्या 25 लाख नोकऱ्या कमी झाल्या.

अर्थव्यवस्था वेगाने वाढण्याची गरज :जूनमध्ये पगारदार नोकऱ्यांमध्ये कपात झाल्यामुळेही चिंता वाढली आहे. सरकारने सशस्त्र दलांची मागणी कमी केली आणि खाजगी इक्विटी-अनुदानित नोकऱ्यांमधील संधी कमी होऊ लागल्या. या नोकऱ्या केवळ चांगल्या पावसाने वाचवता येणार नाहीत. अशा प्रकारच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठी नजीकच्या भविष्यात अर्थव्यवस्थेला वेगाने वाढण्याची गरज आहे. आकडेवारीनुसार, बेरोजगारीचा सर्वाधिक दर हरियाणात 30.6 टक्के होता. यानंतर राजस्थानमध्ये 29.8 टक्के, आसाममध्ये 17.2 टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये 17.2 टक्के आणि बिहारमध्ये 14 टक्के इतके होते.

हेही वाचा :Owaisi Criticized BJP : देशातील महागाई, बेरोजगारीला मोदी नव्हे तर अकबर आणि औरंगजेब जबाबदार : ओवैसी

ABOUT THE AUTHOR

...view details