नवी दिल्ली - काँग्रसेचे प्रवक्ते पवन खेडा यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत गोंधळ घालणारा तरुण हा महाराष्ट्रातील अहमदनगर येथील असून त्याचे नाव नचिकेत वाल्हेकर असे आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अजयसिंह बिश्त म्हटल्यामुळे नचिकेतने काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. योगी आदित्यानाथ यांना त्यांचे नाव घेऊन उल्लेख करणे ही अपली संस्कृती नाही, असे करणे म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान आहे. यानंतर त्याने वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.
नचिकेत वाल्हेकर म्हणाला, माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी मी येथे आलेलो नाही. माझ्या काही मागण्या आहेत. पत्रकार परिषदेची जागा ही काही सरकारी हेड कॉटर नाही. येथे मी येऊ शकतो. ज्यांचे आई वडील, पत्नी किंवा पती विदेशी असतील त्यांनी भारतात निवडणुका लढवू नयेत, यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. हीच माझी मागणी आहे.