चेन्नई- वेल्लोरमधील वानियमपाडीजवळ असलेल्या नारायणपूरम मध्ये राहणाऱ्या अनुसुचित जातीतील लोकांना बऱ्याच सामाजिक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. आजही अशीच एक घटना घडली. अनुसुचित जातीतील एका व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये नेण्यास मज्जाव करण्यात आला. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच, वरच्या जातीतील काही लोकांनी प्रेतयात्रा थांबवली आणि लोकांना पुलावरून जाण्यापासून अडवले.
या पुलाला लागूनच, सवर्ण जातीतील काही लोकांची शेतजमीन आहे. ती शेतजमीन ओलांडून पुढे गेल्याशिवाय स्मशानभूमीपर्यंत जाता येत नाही आणि आपल्या शेतजमीनीजवळून अनुसुचित जातीतील लोकांनी जाऊ नये, असे त्या जमीन मालकांचे म्हणणे होते. त्यामुळे, त्यांनी पुलावरच अंत्ययात्रा थांबवली.