- ठाणे - कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी गावात ये-जा करणाऱ्या एका कोरोना योद्धावर बहिष्कार न टाकणाऱ्या कुटूंबावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील कसारा नजीक असलेल्या मोखावणे गावात घडली आहे. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील 32 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा -धक्कादायक ! कोरोना योद्धावर बहिष्कार न टाकणाऱ्या कुटूंबावर धारधार शस्त्राने हल्ला
- मुंबई -विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी आज (सोमवार) अर्ज भरण्याची अखेरची मुदत आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीसह भाजप आणि इतर पक्षांकडून तब्बल २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक अर्ज हे पर्यायी उमेदवार म्हणून भरण्यात आले आहेत. तसेच अपक्ष उमेदवारांची संख्या देखील लक्षणीय असल्याचे सांगण्यात येत आहे.
सविस्तर वाचा -विधानपरिषद निवडणूक : 9 जागांसाठी आत्तापर्यंत तब्बल २२ अर्ज दाखल
- वॉशिंग्टन डी. सी- कोरोना महामारीमुळे जागतिक मंदी आली आहे. अशातच अमेरिकेच्या फेडरल बँकेतील अधिकाऱ्याने रोजगाराची स्थिती आणखी गंभीर होणार असल्याचा इशारा दिली आहे. एप्रिल महिन्यापासून २ कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. मात्र, रोजगाराची स्थिती यापेक्षा गंभीर होणार असल्याचे फेडरल बँकेच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
सविस्तर वाचा -'नोकऱ्यांबाबतचे आणखीन वाईट दिवस अजून येणे बाकी आहेत'
- मनमाड(नाशिक) -कोरोनासारख्या महामारीत आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर हल्ले सुरूच आहेत. नांदगाव तालुक्यातील नांदगाव-चाळीसगाव चेक पोष्टवर कर्तव्यावर असरणाऱ्या २ पोलिसांवर पोलीस पाटील यांच्यासह एका पत्रकाराने टोळक्यासह येऊन मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावरील कपडे फाडण्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. याप्रकरणी हल्लेखोरांविरोधात नांदगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा -नातेवाईकांच्या वाहनांची तपासणी केल्याच्या रागातून जमावाच्या मदतीने पत्रकाराची पोलिसांना मारहाण
- मुंबई -लॉकडाऊनच्या काळात ठप्प पडलेल्या उद्योग विश्वासाठी अतिशय महत्वाची बातमी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू असून सहा लाख कामगार रुजू झाले असल्याचे देसाई यांनी सांगितले. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर, पुणेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आज उद्योगमंत्री बोलत होते.
सविस्तर वाचा -दिलासादायक.. राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, सहा लाख कामगार रुजू - उद्योगमंत्री
- बीड- राज्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक हे अत्यंत तुटपुंजा मानधनात काम करत आहेत. आता शासनाने मानधन वाढवून द्यावे, या मागणीसाठी आशा वर्कर आणि गटप्रवर्तक आवाज उठवणार आहेत. 11 ते 13 मे दरम्यान काळ्या फिती लावून हे सर्व कामगार काम करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन आंधळे यांनी सांगितले.