बैतूल -मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात तावा नदीच्या पुलावरून लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक खाली कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच मजूर होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्रीच्या वेळी घोडाडोंगरी तालुक्यातील चोपना पोलीस स्टेशन परिसरातील तवा पुलावरून लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक खाली कोसळला. ट्रकच्या खाली आल्यामुळे सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच मजूर आणि ट्रक चालकाचा समावेश आहे. माहिती मिळताच चोपना पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि क्रेनच्या मदतीने ट्रकच्या खाली सापडलेले मृतदेह बाजूला काढण्यात आले.
हेही वाचा -जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या 10 जणांना वाचवले, 'या' जिल्ह्यांत हिमस्खलनाचा इशारा