महाराष्ट्र

maharashtra

उत्तर प्रदेशची ओळख 'हत्या प्रदेश' होत आहे - अखिलेश यादव

By

Published : Aug 18, 2019, 5:25 PM IST

सुरक्षिततेच्या मुद्यावरुन उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. उत्तर प्रदेशची ओळख 'उत्तम प्रदेश' म्हणून व्हायला हवी होती, मात्र राज्याची ओळख 'हत्या प्रदेश' म्हणून होत असल्याचे यादव म्हणाले.

अखिलेश यादव यांचा भाजपवर निशाणा

लखनऊ - सुरक्षिततेच्या मुद्यावरुन उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. उत्तर प्रदेशची ओळख 'उत्तम प्रदेश' म्हणून व्हायला हवी होती, मात्र राज्याची ओळख 'हत्या प्रदेश' म्हणून होत असल्याचे यादव म्हणाले.

दिवसें-दिवस उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. मागील काही दिवसात उत्तर प्रदेशमध्ये हत्यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे. या मुद्यावरुन अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर टीका केली. उत्तर प्रदेशची ओळख ही आता हत्या प्रदेश होत असल्याचे यादव म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details