महाराष्ट्र

maharashtra

भारताकडून 'शौर्य' क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीचे यशस्वी परीक्षण, ८०० किमी दूरपर्यंत शत्रूंना पाजणार पाणी

By

Published : Oct 3, 2020, 4:31 PM IST

भारताने आज जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या शौर्य क्षपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले. हे क्षेपणास्त्र जवळपास ८०० किलोमीटर अंतरावरील शत्रुंचे लक्ष्य भेदण्यास सक्षम आहे.

shaurya-missile
शौर्य' क्षेपणास्त्रा

बालासोर - पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने शनिवार शौर्य क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीचे यशस्वी परीक्षण केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसान या क्षेपणास्त्रामध्ये जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता आहे. ओडिशा राज्यातील बालासोरमध्ये या क्षेपणास्त्राचे परीक्षण करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शौर्य क्षेपणास्त्राची नवी आवृत्ती 800 किमी अंतरावरील लक्ष्याचा अचूक भेद करून शकते. शौर्य मिसाइलच्या परीषणामुळे भारतीय संरक्षण यंत्रणा मजबूत झाली असून हे क्षेपणास्त्र वजनाने हलके व वापरास सोपे असे आहे.

यापूर्वी भारताने बुधवारी ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाइलचे यशस्वी परीक्षण केले होते. जे 400 किलोमीटर अंतरावरील टारगेटला ध्वस्त करण्याच्या क्षमतेचे आहे. संरक्षण आणि विकास संघठन (डीआरडीओ) ने ओडिशाच्या बालासोरमध्ये पीजे-10 प्रोजेक्ट अंतर्गत मिसाइलचे परीक्षण केले आणि मिसाईल स्वदेशी बूस्टरबरोबर लाँच केली.

हे ब्रह्मोस सुपरसोनिक मिसाईलच्या अपडेट व्हर्जनचे दुसरे यशस्वी परीक्षण होते. डीआरडीओचे चेअरमन डॉ. जी सतीश रेड्डी यांनी यशस्वी परीक्षणाबद्दल वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details