महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 3, 2020, 10:43 PM IST

ETV Bharat / bharat

'कोरोना आटोक्यात आणण्यात भारताला मोठ्या प्रमाणात यश'

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारत आघाडीवर असून जगभर भारताने आपले प्रयत्न केले. दीडशेपेक्षा जास्त देशांना भारताने वैद्यकीय मदत देऊ केली. स्वत: भारत कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला, असे त्यांनी झोर्बीचिविली यांना सांगितले. राष्ट्रपती भवनने अधिकृत पत्रक काढून याबाबत माहिती दिली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद
राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली - भारताने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खूप कठोर प्रयत्न केले, आणि मोठ्या प्रमाणात प्रसार रोखण्यात यशही आले आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (बुधवार) म्हटले. कोविंद यांनी आज जॉर्जियाचे राष्ट्रपती सलोमी झोर्बीचिविली यांच्याशी फोनवर चर्चा केली.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारत आघाडीवर असून जगभर भारताने आपले प्रयत्न केले. दीडशेपेक्षा जास्त देशांना भारताने वैद्यकीय मदत देऊ केली. स्वत: भारत कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला, असे त्यांनी झोर्बीचिविली यांना सांगितले. राष्ट्रपती भवनने अधिकृत पत्रक काढून याबाबत माहिती दिली.

कोरोनाच्या फैलावामुळे जगापुढे निर्माण झालेल्या आव्हानांची दोन्ही नेत्यांनी दखल घेत जगभर जनजीवन विसकळीत झाल्याचे ते म्हणाले. रामनाथ कोविंद यांनी जॉर्जियाने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

जॉर्जियामध्ये अनेक भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. तसेच भारतीय नागरिकही तेथे राहत आहेत. या सर्वांना माघारी आणण्यास मदत केल्यामुळे आणि भारतीयांना सहकार्य केल्याबद्दल कोविंद यांनी जॉर्जियाच्या राष्ट्रपतींचे आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details