महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 17, 2019, 7:05 PM IST

Updated : Sep 17, 2019, 9:32 PM IST

ETV Bharat / bharat

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग, तो ताब्यात घेऊच - एस. जयशंकर

मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला काही दिवसांपूर्वी १०० दिवस पूर्ण झाले. या १०० दिवसांमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.

S Jaishankar

नवी दिल्ली - भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानवर निशाणा साधत, भारताला एका शेजाऱ्याकडून दहशतवादी धोका असल्याचे विधान केले आहे. सीमेवरील आणि एकूणच दहशतवादाविरूद्ध कृती करण्याची भारताच्या एका शेजाऱ्याला आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. आज एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

यासोबतच, पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, आणि एक दिवस नक्कीच त्यावर भारताचा ताबा असेल असा विश्वासदेखील एस जयशंकर यांनी व्यक्त केला.

मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला काही दिवसांपूर्वी १०० दिवस पूर्ण झाले. या १०० दिवसांमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना, एस. जयशंकर यांनी, या काळात सरकारची महत्त्वपूर्ण कामगिरी ही राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाच्या लक्ष्यांमधील संबंध मजबूत करणे ही असल्याचे स्पष्ट केले.

जी-२० परिषद, ब्रिक्स किंवा पर्यावरणसंबंधी एखादी जागतिक दर्जाची परिषद असो, या सर्व ठिकाणी भारताचे म्हणणे, भारताचे मत याची आता गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचे देखील जयशंकर यांनी सांगितले.

यासोबतच भारताचे प्रश्न, भारताच्या सीमेचे प्रश्न किंवा कलम ३७० सारखा मुद्दा यांना जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळत आहेत. तसेच जागतिक स्तरावर यासंबंधी भारताचे समर्थन केले जाते आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : HBD MODI: ओबामांनीही सांगितलं जास्त झोपत जा, वाचा रोचक किस्से

Last Updated : Sep 17, 2019, 9:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details