तिरुवअनंतपूरम - दुबईमध्ये अडकलेल्या १७७ भारतीयांना घेऊन एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान काल(मंगळवारी) केरळमधील कन्नूर विमानतळावर दाखल झाले. प्रवाशांमध्ये ५ बालकांचा समावेश होता. आखाती देशातून हे पहिलेच विमान कन्नूर विमानतळावर आले आहे.
हेही वाचा -
दरम्यान, तिरुवअनंतपूरम दोहा फ्लाईट रविवारी रद्द करण्यात आली होती. हे विमान आज १८१ प्रवाशांसह तिरुअनंतपूरम विमानतळावर येणार आहे. प्रत्येक विमानतळावर थर्मल डिटेक्शन यंत्र ठेवण्यात आले आहे. सर्व प्रवाशांची तपासणी करुनच सोडण्यात येत आहे. प्रवाशांना १४ दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.