नवी दिल्ली - द्वारका भागातील उत्तर नगर परिसरात खंडणी वसूली करणाऱ्यांनी भाजी विकणाऱ्या ८२ वर्षाच्या व्यक्तीची हत्या केली. ५० रूपये देण्यास नकार दिला म्हणून त्या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्या मृत व्यक्तीचे नाव बख्सी खान असे होते.
काय आहे प्रकरण -
बख्सी खान त्यांची पत्नी आणि ३० वर्षाची मुलगी हे हस्ताल गावात राहत होते. ते आजूबाजूच्या बाजारात भाजी विकण्याचे काम करतात. शनिवारी रात्री काही युवक त्यांच्याकडे आले आणि साहित्य विकण्याच्या बदल्यात ५० रूपये मागूलागले. मृत व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला. यानंतर त्या युवकांनी बख्सी यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. युवकांपैकी एका युवकाने बख्सी यांना विटेने मारहान करण्यास सुरूवात केली. यातच त्यांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. रूग्णालयात डॉक्टरनी त्या व्यक्तील तपासुन मृत घोषीत केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.