नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'एन्व्हारन्मेटल इम्पॅक्ट असेसमेंट 2020' आराखडा म्हणजे देशाची लूट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. पर्यावरणीय ऱ्हास रोखण्यासाठी हा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केलीय.
लूटऑफ द नेशन हेच ईआयए २०२० च्या मसुद्याचे उद्दीष्ट असल्याचे राहुल गांधी म्हणाले. नरेंद्र मोदी त्यांच्या 'सूट-बूट' मधील मित्रांना देशातील संसाधने लुटण्यासाठी मदत करत आहेत. भाजप सरकार श्रीमंतांसाठी काय करत आहे, याचे आणखी एक भयंकर उदाहरण आहे, असे गांधींनी ट्वीट केले आहे. ईआयए २०२० चा मसुदा मागे घ्यावा लागेल, अशी मागणी त्यांनी केलीय. पर्यावरणीय विनाश थांबवण्यासाठी हा आराखडा रद्द करण्याचा मुद्दा राहुल गांधी यांच्या ट्वीटमध्ये आहे.