न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) भारताच्या कुटनितीचा विजय झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात दोन वर्षे मुदतीच्या अस्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीस चीन व पाकिस्तान यांचा समावेश असलेल्या एशिया-पॅसिफिक गटाने पाठिंबा दिला आहे. याची माहिती भारतीय राजदूत सय्यद अकबरूद्दीन यांनी दिली आहे.
पंधरा सदस्यीय सुरक्षा मंडळातील पाच अस्थायी सदस्यपदांसाठी पुढील वर्षी जूनमध्ये निवडणूक होणार आहे. यात निवड झालेल्या अस्थायी सदस्यांना २०२१ व २०२२ अशी दोन वर्षे काम करता येणार आहे.