महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 14, 2020, 8:35 AM IST

Updated : Feb 14, 2020, 10:27 AM IST

ETV Bharat / bharat

पुलवामा दहशतवादी हल्ला ; पंतप्रधान मोदींनी जवानांना वाहिली श्रद्धांजली

पुलवामामध्ये मागील वर्षी दहशतवादी हल्ल्यांमध्ये जीव गमावणाऱ्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टि्वट करून श्रद्धांजली वाहिली.

पुलवामा दहशतवादी हल्ला
पुलवामा दहशतवादी हल्ला

नवी दिल्ली - नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये मागील वर्षी दहशतवादी हल्ल्यांमध्ये जीव गमावणाऱ्या जवानांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी टि्वट करून जवानांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ल्यांमध्ये जीव गमावणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. जवानांनी देशाच्या संरक्षणासाठी आणि सेवेसाठी आपले जिवन समर्पीत केले. त्यांचे हौतात्म्य देश कधीच विरसरणार नाही, असे मोदींनी म्हटले आहे.

देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी सर्वोच्च बलिदान देणारे शूरवीर जवान आणि त्यांच्या कुटुंबीयाप्रती भारत कायम कृतज्ञ राहील, असे अमित शाह यांनी टि्वट केले आहे.

१४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये केंद्रीय पोलीस राखीव दल (सीआरपीएफ)च्या ४० जवानांना वीरमरण आले होते. त्यामुळे आजचा दिवस हा भारताच्या इतिहासामधला काळा दिवस आहे. पुलवामा हल्ला ही देशासाठी फार मोठी शोकांतिका असून आज या घटनेला 1 वर्षे पूर्ण होत आहे.

Last Updated : Feb 14, 2020, 10:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details