बेंगळुरु -अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) महाराष्ट्राचे प्रभारी सचिव आणि माजी मंत्री एच .के पाटील यांनी (2016 ते 2018)या काळात 19 लाखांहून अधिक ईव्हीएम मशिन गायब झाल्याचा दावा केला आहे. (EVM Machine Missing In Karnatak) निवडणुक सुधारणांवर झालेल्या चर्चेत त्यांनी हा दावा केला आहे. यावर कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल असे आश्वाकन दिले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या (EC) अधिकाऱ्यांनाही बोलावल जाईल असही ते म्हणाले आहेत.
ईव्हीएमबाबत अनेक शंका आहेत - विधानसभेत निवडणूक सुधारणांवरील चर्चेदरम्यान सर्व सदस्यांनी व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि निवडणूक अनियमिततेवर आपली मते मांडली. (Former Minister H. Patil) पण काँग्रेसचे एच .के पाटील यांनी निवडणूक सुधारणेवर चर्चेत (2016 ते 2018)या काळात 19 लाखांहून अधिक ईव्हीएम मशिन गायब झाल्याचा दावा केला आहे.
शंका दूर करण्याचा कोणताही प्रयत्न नाही - नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या. यामध्ये 53 मंत्र्यांपैकी 22 मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. यावर लोक काय विचार करतील? असा प्रश्न उपस्थित केला आहे. (H. K. Patil EVM claims to be missing) ईव्हीएमबाबत अनेक शंका आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने ही शंका दूर करण्याचा कोणताही प्रयत्न केला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.