महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 10, 2021, 6:05 AM IST

ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याची 75 वर्षे : आसाममधील गांधींचे सच्चे अनुयायी कृष्णनाथ सरमा

महात्मा गांधींनी समाजातून अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि ज्या दलितांना त्यांनी हरिजन म्हटले त्यांच्या उत्थानासाठी एक नैतिक लढाई लढली. त्यांनी दलितांच्या उत्थानासाठी 'हरिजन सेवक संघ' ही संस्था स्थापन केली. संघाने मागास वर्गाला मंदिर, शाळा, रस्ते आणि पानवठे इत्यादी सर्व सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यास मदत केली. देशाच्या इतर भागांसह, आसाममध्येही कृष्णनाथ सरमा यांनी सुरू केलेली ही चळवळ ज्याला हरिजन बंधू असेही म्हटले जाते.

स्वातंत्र्याची 75 वर्षे : आसाममधील गांधींचे सच्चे अनुयायी कृष्णनाथ सरमा
स्वातंत्र्याची 75 वर्षे : आसाममधील गांधींचे सच्चे अनुयायी कृष्णनाथ सरमा

दिसपूर(आसाम) : देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी लढे दिले. तितकेच महात्मा गांधींनी समाजातून अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि ज्या दलितांना त्यांनी हरिजन म्हटले त्यांच्या उत्थानासाठी एक नैतिक लढाई लढली. त्यांनी दलितांच्या उत्थानासाठी 'हरिजन सेवक संघ' ही संस्था स्थापन केली. संघाने मागास वर्गाला मंदिर, शाळा, रस्ते आणि पानवठे इत्यादी सर्व सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यास मदत केली. देशाच्या इतर भागांसह, आसाममध्येही कृष्णनाथ सरमा यांनी सुरू केलेली ही चळवळ ज्याला हरिजन बंधू असेही म्हटले जाते.

स्वातंत्र्याची 75 वर्षे : आसाममधील गांधींचे सच्चे अनुयायी कृष्णनाथ सरमा

28 फेब्रुवारी 1887 रोजी आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील सरबाईबंधा येथे जन्मलेले कृष्णनाथ सरमा यांनी गांधीजींच्या हरिजन चळवळीद्वारे हरिजनांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघर्ष चालू ठेवला. मात्र त्यांचे उपक्रम ब्राह्मण समाजात चांगले गेले नाहीत आणि त्यांना बहिष्कृत केले गेले. अर्ल लॉ कॉलेजमधून विज्ञान आणि कायद्यात पदवीधर, सरमा यांनी वकीलीचा सराव केला. परंतु नंतर महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी 1921 मध्ये आपल्या व्यवसायाचा त्याग केला.

कृष्णनाथ सरमा यांना 1921 मध्ये जोरहाट जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा कार्यभार सोपवण्यात आला. त्याचवर्षी सरबीना नवीन चंद्र बोर्दोलोई, तरुण राम फुकन आणि कुलधर चालिहा यांच्यासह एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. त्या दिवसांत सरमा यांनी गांधीजींच्या विचारांचे अनुसरण करत आसाममध्ये शाळा-महाविद्यालये सुरू करणे, रुग्णालये उभारणे आणि दुर्गम भागात रस्ते बांधणे यासारख्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी अनेक चळवळी सुरू केले. त्यांच्या या कामांपैकी, सरमा अस्पृश्यता निर्मूलनाच्या दिशेने उभे राहिले. एका सनातनी ब्राह्मण कुटुंबातील, सरमा यांनी समाजातील हरिजनांचे त्यांच्या घरी नामघर (प्रार्थनास्थळ) मध्ये स्वागत केले, हे त्या दिवसातील एक धाडसी कृत्य. 1934 मध्ये जेव्हा महात्मा गांधींनी दुसऱ्यांदा आसामला भेट दिली. तेव्हा गांधीजींनी हरिजनांसाठी नामघरचे उद्घाटन केले. जे आसाममध्ये यापूर्वी कधीही झाले नव्हते.

गांधीजींच्या प्रत्येक आदर्शाचे आयुष्यभर पालन करणारे एक सच्चे गांधीवादी 2 फेब्रुवारी 1947 रोजी मरण पावले. मात्र आसामच्या या समाजसुधारकाला आजपर्यंत राज्यात योग्य मान्यता मिळालेली नाही. जोरहाट येथील कृष्णनाथ सरमा यांनी स्थापन केलेला साबरमती आश्रम सध्या जीर्ण अवस्थेत आहे. स्थानिकांनी आणि लागोपाठच्या सरकार लक्ष देत नसल्यामुळे आश्रमाच्या आजूबाजुला झुडपी वाढली आहेत. आसामच्या स्वातंत्र्यपूर्व काळाचा समृद्ध इतिहास असलेल्या आश्रमाची पुनर्स्थापना करण्यासाठी सरकारकडे कोणतीही योजना नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जोरहाटमधील सर्बईबंधा परिसरातील साबरमती आश्रमाच्या आवारात कृष्णनाथ सरमा यांचे स्मारक अजूनही जीर्ण अवस्थेत आहे.

हेही वाचा -स्वातंत्र्याची 75 वर्षे : सॉन्डर्सच्या हत्येनंतर इथे लपले होते भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त, वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details