सोलापूर - महाआघाडी सरकारने बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेत त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यांना मतदानाचा अधिकार देण्यास शासनाला निर्देश करावेत, अशी मागणी माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी मुंबई येथे राज्यपाल भगतिसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हेही वाचा - खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींच्या अडचणीत वाढ, सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भाजप सरकारने शेतकर्यांना न्याय मिळावा, त्यांच्या हक्काची बाजार समिती असावी म्हणून त्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देत शेतकर्यांचा सन्मान केला होता. मात्र महाआघाडी सरकारने केवळ विरोध म्हणून हा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे शेतकर्यांवर अन्याय तर झाला आहेत शिवाय त्यांचा अपमानही झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांना मतदानाचा अधिकार देण्यास शासनास निर्देश करावेत, असे देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा - सोलापुरात 'कोरोना'चा रुग्ण नाही, अश्विनी रुग्णालयाचा खुलासा