ETV Bharat / state

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील ब्रिटिश कालीन पूल अखेर कोसळला

author img

By

Published : Nov 21, 2019, 9:17 AM IST

केदारखेडा येथील गिरिजा-पुर्णा नदीवरील ब्रिटिश कालीन पूल कोसळला आहे. पूलाचा पाया उघडा पडल्यामुळे पाण्याच्या जोरदार प्रवाहात सुमारे शंभर ते सव्वाशे मीटर लांबीचा पूल कोसळला.

केदारखेडा येथील ब्रिटिश कालीन पूल अखेर कोसळला

जालना - भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील गिरिजा-पुर्णा नदीवरील जुन्या पूलाच्या मध्य भागाचा पाया उघडा पडला होता. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने सुमारे शंभर ते सव्वाशे मीटर लांबीचा पूल कोसळला आहे. बुधवारी अकरा वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने प्रवासी नागरिकांची तारांबळ उडाली. त्यानंतर लगतच्या पूलावरून दुहेरी वाहतूक सुरू केली.

केदारखेडा येथील गिरिजा-पुर्णा नदीवरील पूल कोसळला

हेही वाचा... जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन समाजकारणाचा यज्ञ तेवत ठेवणे गरजेचे - सुशिलकुमार शिंदे

जालना ते जळगाव मार्गावर केदारखेडा येथील गिरिजा-पुर्णा नदीवर किमान अंदाजे 80 ते 90 वर्षे अगोदर सुमारे शंभर ते सव्वाशे मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला. हा ब्रिटिशकालीन पूल अनेक महापुरांचा साक्षीदार ठरला आहे. कमी उंचीचा हा पूल महापुरात पाण्याखाली जात असल्याने या पुलालगत केंद्रीय रस्ते निधीतून नव्याने उंच पूल उभारण्यात आला. पूर्वी महापुरात जुना पूल पाण्याखाली गेल्यावर वाहतुक पुर्णपणे बंद होत होती. मात्र नव्याने झालेल्या पूलामुळे वाहतुकीचा प्रश्‍न निकाली निघाला.

हेही वाचा... संपूर्ण देशात लागू करणार 'एनआरसी' : अमित शाह

दरम्यान, काही वर्षांपूर्वी महाड येथील सावित्री पूल वाहून गेल्यावर शासनाने ब्रिटिशकालीन पूलाच्या कामाची स्ट्रक्‍चरल ऑडिट केले. त्या वेळी जुन्या पुलावरून वाहतूक बंदचा फलकही लावण्यात आला होता. त्यामुळे जुन्या पूलावरून वाहतूक बंद करून ती नव्या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर जुना पूल केवळ पादचाऱ्यांसाठी वापरात होता.
बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मासेमारी करणाऱ्यांनी येथे मोठा आवाज झाल्याचे ऐकले. त्यांनी पडलेल्या पुलाची काढलेली छायाचित्रे काही क्षणातच सोशल मीडियावर पसरली. यानंतर नागरिकांनी पडलेला पूल पाहण्यासाठी गर्दी केली. पूल पडल्याची माहिती मिळताच तहसीलदार संतोष गोराड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिगंबर कोल्हे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

जालना - भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील गिरिजा-पुर्णा नदीवरील जुन्या पूलाच्या मध्य भागाचा पाया उघडा पडला होता. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने सुमारे शंभर ते सव्वाशे मीटर लांबीचा पूल कोसळला आहे. बुधवारी अकरा वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने प्रवासी नागरिकांची तारांबळ उडाली. त्यानंतर लगतच्या पूलावरून दुहेरी वाहतूक सुरू केली.

केदारखेडा येथील गिरिजा-पुर्णा नदीवरील पूल कोसळला

हेही वाचा... जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन समाजकारणाचा यज्ञ तेवत ठेवणे गरजेचे - सुशिलकुमार शिंदे

जालना ते जळगाव मार्गावर केदारखेडा येथील गिरिजा-पुर्णा नदीवर किमान अंदाजे 80 ते 90 वर्षे अगोदर सुमारे शंभर ते सव्वाशे मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला. हा ब्रिटिशकालीन पूल अनेक महापुरांचा साक्षीदार ठरला आहे. कमी उंचीचा हा पूल महापुरात पाण्याखाली जात असल्याने या पुलालगत केंद्रीय रस्ते निधीतून नव्याने उंच पूल उभारण्यात आला. पूर्वी महापुरात जुना पूल पाण्याखाली गेल्यावर वाहतुक पुर्णपणे बंद होत होती. मात्र नव्याने झालेल्या पूलामुळे वाहतुकीचा प्रश्‍न निकाली निघाला.

हेही वाचा... संपूर्ण देशात लागू करणार 'एनआरसी' : अमित शाह

दरम्यान, काही वर्षांपूर्वी महाड येथील सावित्री पूल वाहून गेल्यावर शासनाने ब्रिटिशकालीन पूलाच्या कामाची स्ट्रक्‍चरल ऑडिट केले. त्या वेळी जुन्या पुलावरून वाहतूक बंदचा फलकही लावण्यात आला होता. त्यामुळे जुन्या पूलावरून वाहतूक बंद करून ती नव्या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर जुना पूल केवळ पादचाऱ्यांसाठी वापरात होता.
बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मासेमारी करणाऱ्यांनी येथे मोठा आवाज झाल्याचे ऐकले. त्यांनी पडलेल्या पुलाची काढलेली छायाचित्रे काही क्षणातच सोशल मीडियावर पसरली. यानंतर नागरिकांनी पडलेला पूल पाहण्यासाठी गर्दी केली. पूल पडल्याची माहिती मिळताच तहसीलदार संतोष गोराड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिगंबर कोल्हे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

Intro:
Slag.भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील ब्रिटिश कालीन पुल अखेर कोसळला.. कोणतीही जीवतहानी नाही..

Anchor.भोकरदन: भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील गिरिजा-पुर्णा नदीवरील जुन्या पुलाच्या मध्य भागाचा पाया उघडा पडल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने सुमारे शंभर ते सव्वाशे मीटर लांबीचा पूल कोसळला. अकरा वाजेच्या सुमारास घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने नागरिकांची तारांबळ उडाली. नव्याने झालेल्या पुलामुळे या जुन्या पुलावरील वाहतूक बंद केली होती. त्यानंतर लगतच्या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू केली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 
दरम्यान पूल पडल्याची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांची गर्दी वाढली.
जालना ते जळगाव मार्गावर केदारखेडा येथील गिरिजा-पुर्णा नदीवर किमान अंदाजे 80ते90 वर्षे अगोदर सुमारे शंभर ते सव्वाशे मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला. या ब्रिटिशकालीन पूल अनेक महापुरांचा साक्षीदार ठरला आहे. कमी उंचीचा हा पूल महापुरात पाण्याखाली जात असल्याने या पुलालगत केंद्रीय रस्ते निधीतून नव्याने उंच पूल उभारण्यात आला. त्यामुळे पूर्वी महापुरात जुना पूल पाण्याखाली गेल्यावर जालना ते जळगाव महामार्ग पुर्णपणे बंद होत होता व वाहतूक दोन दोन दिवस ठप्प होत होती. नव्याने झालेल्या पुलामुळे वाहतुकीचा प्रश्‍न निकाली निघाला. मात्र नवीन पूल झाल्यापासून महापूरच आला नसल्याची 
स्थिती आहे. 
दरम्यान, काही वर्षांपूर्वी महाड येथील सावित्री पूल वाहून गेल्यावर शासनाने ब्रिटिशकालीन पुलाच्या कामाची स्ट्रक्‍चरल ऑडिट केले. त्या वेळी जुन्या पुलावरून वाहतूक बंदचा फलकही लावण्यात आला होता. त्यामुळे जुन्या पुलावरून वाहतूक बंद करून ती नव्या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे जुना पूल केवळ पादचाऱ्यांसाठी वापरात होता.
आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सुदैवाने दुर्घटना घडली नसली, तरी मासेमारी करणाऱ्यांनी मोठा आवाज झाल्याचे ऐकले. त्यातच पडलेल्या पुलाची छायाचित्रासह बातमी काही क्षणातच सोशल मीडियावर पसरताच नागरिकांनी पडलेला पूल पाहण्यासाठी गर्दी केली.पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या निर्णयामुळे मोठी हानी टळल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली. पूल पडल्याची माहिती मिळताच तहसीलदार संतोष गोराड, सार्वजनिक बांधकाम विभा गाचे दिगंबर कोल्हे, मंडळ अधिकारी थारेवाल,तलाठी शेटे,कोतवाल शेख उस्मानभाई यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.व पुलाच्या दोन्ही बाजूने जेसीबीद्वारे चर खोदून रस्ता बंद केला....
कमलकिशोर जोगदंडे,Etv bharat news भोकरदनBody:
Slag.भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील ब्रिटिश कालीन पुल अखेर कोसळला.. कोणतीही जीवतहानी नाही..

Anchor.भोकरदन: भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील गिरिजा-पुर्णा नदीवरील जुन्या पुलाच्या मध्य भागाचा पाया उघडा पडल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने सुमारे शंभर ते सव्वाशे मीटर लांबीचा पूल कोसळला. अकरा वाजेच्या सुमारास घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने नागरिकांची तारांबळ उडाली. नव्याने झालेल्या पुलामुळे या जुन्या पुलावरील वाहतूक बंद केली होती. त्यानंतर लगतच्या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू केली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 
दरम्यान पूल पडल्याची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांची गर्दी वाढली.
जालना ते जळगाव मार्गावर केदारखेडा येथील गिरिजा-पुर्णा नदीवर किमान अंदाजे 80ते90 वर्षे अगोदर सुमारे शंभर ते सव्वाशे मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला. या ब्रिटिशकालीन पूल अनेक महापुरांचा साक्षीदार ठरला आहे. कमी उंचीचा हा पूल महापुरात पाण्याखाली जात असल्याने या पुलालगत केंद्रीय रस्ते निधीतून नव्याने उंच पूल उभारण्यात आला. त्यामुळे पूर्वी महापुरात जुना पूल पाण्याखाली गेल्यावर जालना ते जळगाव महामार्ग पुर्णपणे बंद होत होता व वाहतूक दोन दोन दिवस ठप्प होत होती. नव्याने झालेल्या पुलामुळे वाहतुकीचा प्रश्‍न निकाली निघाला. मात्र नवीन पूल झाल्यापासून महापूरच आला नसल्याची 
स्थिती आहे. 
दरम्यान, काही वर्षांपूर्वी महाड येथील सावित्री पूल वाहून गेल्यावर शासनाने ब्रिटिशकालीन पुलाच्या कामाची स्ट्रक्‍चरल ऑडिट केले. त्या वेळी जुन्या पुलावरून वाहतूक बंदचा फलकही लावण्यात आला होता. त्यामुळे जुन्या पुलावरून वाहतूक बंद करून ती नव्या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे जुना पूल केवळ पादचाऱ्यांसाठी वापरात होता.
आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सुदैवाने दुर्घटना घडली नसली, तरी मासेमारी करणाऱ्यांनी मोठा आवाज झाल्याचे ऐकले. त्यातच पडलेल्या पुलाची छायाचित्रासह बातमी काही क्षणातच सोशल मीडियावर पसरताच नागरिकांनी पडलेला पूल पाहण्यासाठी गर्दी केली.पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या निर्णयामुळे मोठी हानी टळल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली. पूल पडल्याची माहिती मिळताच तहसीलदार संतोष गोराड, सार्वजनिक बांधकाम विभा गाचे दिगंबर कोल्हे, मंडळ अधिकारी थारेवाल,तलाठी शेटे,कोतवाल शेख उस्मानभाई यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.व पुलाच्या दोन्ही बाजूने जेसीबीद्वारे चर खोदून रस्ता बंद केला....
कमलकिशोर जोगदंडे,Etv bharat news भोकरदनConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.