महाराष्ट्र

maharashtra

जन आशिर्वाद यात्रा थांबणार नाही, महाड कोर्टातील निकालानंतर पुढील निर्णय घेऊ- प्रवीण दरेकर

By

Published : Aug 24, 2021, 10:39 PM IST

रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आकसापोटी अटक करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. ते म्हणाले, की, जन आशिर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत होता. त्याच्या असूयपोटी नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्यात आले. पोलिसी प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांनी काढलेली नोटीस चुकीची आहे. भाजप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक आहेत. पक्षाची संस्कृती पाहता राडेबाजी करणार नाही. मात्र, आव्हान दिले तर कार्यकर्ते खपवून घेणार नाहीत. महाड कोर्टात नेमके काय होते ते पाहून निर्णय घेऊ, वरिष्ठांशी बोलून पुढील निर्णय घेऊ. आकसापोटी कारवाई करण्यात आलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details