महाराष्ट्र

maharashtra

कंगना रणौतच्या गाडीला शेतकऱ्यांचा घेराव

By

Published : Dec 3, 2021, 6:24 PM IST

Published : Dec 3, 2021, 6:24 PM IST

Updated : Dec 3, 2021, 7:14 PM IST

कीरतपूर साहिब (पंजाब) - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत मनालीहून मुंबईला जात असताना कारने पंजाबमधून प्रवास करीत होती. त्यावेळी तिच्यासोबत सुरक्षारक्षकही सोबत होते. परंतु पंजाबमधील कीरतपूर साहिब टोल प्लाजाजवळ शेतकऱ्यांनी तिच्या गाडीला घेरले. कंगनाने माफी मागावी अशी मागणी शेतकरी करीत होते. शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. बराच गोंधळ झाल्यानंतर कंगनाने सबुरीची भाषा केली व माफीही मागितली. त्यानंतरच तिची गाडी गर्दीतून पुढे जाऊ शकली. कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा याबाबतचा एक व्हडिओ शेअर केला आहे.
Last Updated : Dec 3, 2021, 7:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details