हैदराबाद :मुलांसाठी सर्वात महत्त्वाचं नातं हे त्याच्या पालकांशी निर्माण केलेलं नातं असतं. एक मूल त्याच्या सभोवतालच्या जगाबद्दल त्याच्या पालकांकडून शिकतं. मुलं सुरक्षितता, प्रेम इत्यादींसाठी त्यांच्या पालकांवर अवलंबून असतात. मुलं आणि पालक यांच्यात घट्ट नातं निर्माण होणं अत्यावश्यक असतं. जर तुम्हीही पालक असाल तर मुलाशी घट्ट नातं निर्माण करण्याचा पाया अगदी सुरुवातीपासूनच घातला पाहिजे. मुलाला समजून घ्या, त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवा आणि त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करा. जाणून घेऊ या अशा काही बाबी ज्यामुळे तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट होऊ शकतं.
तुमचं प्रेम व्यक्त करा : निरोगी आणि चांगल्या नात्यासाठी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांवर प्रेम व्यक्त करणं आवश्यक आहे. तुमच्या बाळाला मिठी मारा, त्याला प्रेमाने सांभाळा म्हणजे त्याला समजेल की तुमच्या आणि त्याच्यामधलं नातं खास आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांशी बोलता, तेव्हा त्यांच्याशी जवळीक साधण्याचा आणि त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करा. त्यांना प्रेमळ वागणूक देऊन मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहित करा.
तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे सांगत राहा : प्रत्येक पालकाचं आपल्या मुलांवर अपार प्रेम असतं, हे उघड आहे. पण हे त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं नाही तर त्यांना कळणार कसं? त्यांचं वय कितीही असो. फक्त त्यांना वरचेवर सांगत राहा की, तुमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. यामुळे तुमचं आणि तुमच्या मुलाचे नाते दीर्घकाळ घट्ट राहील.
मर्यादा सेट करा आणि नियम बनवा: जसजसं मुल मोठं होतं आणि त्यांच्या सभोवतालच्या जगाबद्दल शिकतं, त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता वाढत जाते. त्यामुळे तुमच्या मुलांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत, याबद्दल बोला. जेव्हा नियम मोडले जातात तेव्हा योग्य परिणाम होतील याची कल्पना द्या, जेणेकरून नियम मोडले जातात तेव्हा काय होऊ शकतं, हे मुलांना कळेल.