हैदराबाद :नाते कोणतेही असो ते ताजे-तवाने ठेवायला हवे. नात्यातला गोडवा कायमस्वरूपी टिकणारा हवा. लग्न नवीन असेल तर एकमेकांना जाणून घेण्यात वेळ जातो. पण नक्की जोडीदाराचा स्वभाव कसा आहे हे माहिती नसल्याने वाद होतात. तसेच लग्नाला अनेक वर्ष झाल्यावरही एकमेकांची सवय होऊनही एकमेकांचे वागणे आवडत नाही. सततच्या भांडणामुळे मग नात्याचा कंटाळा येतो आणि सारखी चिडचिड होते. अशा परिस्थितीत तुम्ही खाली दिलेल्या गोष्टी जरूर पाळा.
स्पष्टपणे आणि वारंवार संवाद साधा : एखादी गोष्ट पटत नसेल तर ते स्पष्टपणे एकमेकांना सांगा. समजून घ्या आणि शांतपणे संवाद साधा. एकमेकांसाठी वेळ काढा : जर तुम्हाला तुमचे वैवाहिक नाते कायमस्वरूपी टिकवायचे असेल तर तुम्ही एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. अधिकाधिक वेळ घालवल्याने तुम्ही दोघेही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. त्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होते आणि गैरसमज दूर होतात. वैयक्तिक वेळेचे योजना करा : जोडीदारासोबतचा प्रत्येक क्षण एन्जॉय करा. स्वभाव रोमँटिक बनवा आणि जोडीदाराला डेटवर घेऊन जा. डेटवर जाऊन तुमच्या भुतकाळातील सुखद क्षणांना उजाळा द्या. घरी एकमेकांच्या आवडीचे पदार्थ बनवा.