महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात 298 ग्रामपंचायतीसाठी 5907, तर सरपंच पदासाठी 1416 नामांकन अर्ज सादर

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनाचा फौजफाटा कामाला लागलेला आहे. यासाठी ५४ क्षेत्रीय अधिकारी ४२३६ मतदान पथकावरील कर्मचारी, तसेच १०५९ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

By

Published : Mar 10, 2019, 6:32 PM IST

संबंधित छायाचित्र

वर्धा- जिल्ह्यात २९८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. सरपंच पदाची थेट निवडणूक असल्याने २९८ सरपंच पदासाठी अखेरच्या दिवशी १४१६ अर्ज दाखल झाले. सदस्य पदासाठी एकूण ५९०७ नामांकन अर्ज उमेदवारांनी तहसील कार्यालयात दाखल केले. २४ तारखेला १०५९ केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान होणार आहे. गाव स्तरावर होणाऱ्या निवडणुकीत गावातील हेवेदावे आणि पारावर चर्चा रंगायला लागल्या असून वातावरण तापत आहे.

संबंधित व्हिडीओ

ग्रामपंचायत निवडणुका प्रत्यक्ष पक्षाच्या चिन्हावर नसल्या तरी पक्षांचा प्रभाव पॅनलवर असतो. गावात रात्रीच्या वेळी मतदारांची जुळवा-जुळव सुरू झाली आहे. एका-एका मताला या निवडणुकीत महत्व असल्याने नाते-संबंध तसेच बाहेरगावी गेलेल्यांची मनधरणी सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक मजेदार किस्से निवडणुकीच्या काळात पाहायला मिळतात. यात सकाळपासून गावातील नेते मंडळी पांढरे शुभ्र कपडे घालत घरो-घरी जाऊन मताचा जोगवा मागतात. सरपंच थेट निवडणूक लढणार असल्याने सरपंच पदाचा उमेदवारांमध्ये चुरशीची लढत असणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनाचा फौजफाटा कामाला लागलेला आहे. यासाठी ५४ क्षेत्रीय अधिकारी ४२३६ मतदान पथकावरील कर्मचारी, तसेच १०५९ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details