वर्धा- देवळी तालुक्यातील दापोरी येथे रानडुकराने हल्ला केलेल्या एका शेतकऱ्याचा सेवाग्राम येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. तर हिंगणघाट आणि आष्टी तालुक्यात दोन घटनांमध्ये शेतकरी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. वासुदेव ठाकरे ( ६५ ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
वर्ध्यात रान डुकराच्या हल्ल्याच्या तीन घटना, एका शेतक-याचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी
देवळी तालुक्यातील दापोरी शिवारात वासुदेव ठाकरे ( ६५ ) हे सकाळी शेतात जात असताना त्यांच्यवर रानडुकराने हल्ला केला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचाराकरीता त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असता दुपारी २ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
देवळी तालुक्यातील दापोरी शेत शिवारात वासुदेव ठाकरे सकाळी शेतात जात असताना त्यांच्यवर रानडुकराने हल्ला केला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचाराकरीता त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असता दुपारी २ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि सुन असा मोठा परिवार आहे. रानावनातून भटकलेल्या रानडुकराने वडनेर जवळच्या फुकटा येथे शेतमजूर शत्रुघ्न धुर्वे (वय ५५) यांच्यावर पहाटे अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले. सुदैवाने गावातील काही कुत्र्यांनी या रानडुकरावर हल्ला केल्याने शत्रुघ्न धुर्वे बचावले. तसेच गावातील नागरिकांनी घटना स्थळाकडे धाव घेऊन रान डुकराला पिटाळून लावले. धुर्वे हे मोलमजूरी करून संसाराचा गाडा चालावतात.
आष्टी तालुक्यातील पारडी येथील किसनराव सरोद शेतात जातांना अचानक रानडुकराने हल्ला चढवला. यात गंभीर जखमी झाल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती जास्त बिघडत असल्याने पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना करण्यात आले आहे.