वर्धा-नागपूर अमरावती महामार्गावरील कारंजा(घाडगे) येथे पहाटेच्या सुमारास जनावरे घेऊन जाणाऱ्या मालवाहूचा वाहनाचे चाक तुटुन अपघात झाला. मात्र, या अपघातामुळे अवैधरित्या कत्तलखाण्याकडे जाणाऱ्या ११ जनावरांचा जीव वाचल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर वाहनचालक मात्र, गाडी सोडून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जनावरांवर उपचार करून गोशाळेकडे रवाना करण्यात आले आहे.
नागपूर कडून अमरावतीच्या दिशेने ११ गोवंश जनावरांना मालवाहु वाहनात कोंबून कत्तलखाण्याकडे नेत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनेनंतर वाहन चालक पसार झाला आहे. कारंजा पासून पुढे मालवाहूच्या डाव्या बाजूचे चाक हे तुटून पडले. यामुळे गाडी जागेवर थांबली. मात्र, हन चालक भीती पोटी पसार झाला. स्थानिकांना मालवाहू गाडी दिसताच त्यांनी कारंजा पोलिसांना माहिती दिली.
जनावरांनवर केले उपचार
या ठिकाणी जनावरांची प्रकृती गंभीर असल्याने जनावरांनवर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने उपचार करण्यात आले. तसेच जखमी जनावरांवर मलमपट्टी करण्यात आली.