ठाणे - अवघ्या काही तासातच भारताचे चांद्रयाण - २ हे चंद्रावर उतरणार आहे. देशासाठी ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे मत खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले आहे. दक्षिण ध्रवावर यशस्वी यान उतरणारा भारत जगातील पहिलाच देश ठरणार आहे. त्यामुळे देशासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सोमण म्हणाले.
GSLVMKII या रॉकेटची यशस्वी कामगिरी, सॉफ्ट लॅडींग करणारा भारत हा चौथा देश आहे. लँडर व रोवर हे सौर ऊर्जेवर कार्य करणार आहेत. चंद्रावरचा दिवस हा पृथ्वीवरच्या चौदा दिवसांचा असतो. 3 विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यावर त्यातून प्रज्ञान रोवर बाहेर पडेल. लँडरवर 4 उपकरणे, रोवरवर 2 उपकरणे आहेत. 500 मीटरमध्ये रोवर फिरेल, त्यानंतर ते संशोधन करणार असल्याची माहिती सोमण यांनी दिली.