महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 12, 2023, 3:27 PM IST

ETV Bharat / state

Yashwantrao Chavan : यशवंतराव चव्हाणांनी संरक्षणमंत्रीपद स्वीकारण्यापूर्वी 'या' व्यक्तीची घेतली होती परवानगी; जाणून घ्या तो किस्सा...

देशाच्या संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारण्यापुर्वी एका व्यक्तीच्या संमतीची परवानगी यशवंतरावांनी नेहरूंकडे मागितली होती. त्या व्यक्तीचे नाव ऐकून नेहरूंनी देखील सानंद ती अट स्वीकारली होती. ती व्यक्ती होती म्हणजे यशवंतरावांच्या धर्मपत्नी वेणूताई चव्हाण होत्या.

Yashwantrao Chavan
यशवंतराव चव्हाण

सातारा : यशवंतराव चव्हाण म्हणजे लोकोत्तर नेता. हिमालयाएवढे त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारा सह्याद्रीचा सुपूत्र. आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती. यशवंतरावांच्या अनेक आठवणींपैकी सरंक्षण मंत्रीपद स्वीकारण्यापुर्वीची एक आठवण खूप महत्वाची आहे. संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी घेण्याची इच्छा व्यक्त करत माझी तूर्त कोणास सांगू नका, अशी सूचना पंडित नेहरूंनी केली होती. परंतु, पद स्वीकारण्यापुर्वी एका व्यक्तीच्या संमतीची परवानगी यशवंतरावांनी नेहरूंकडे मागितली होती. त्या व्यक्तीचे नाव ऐकून नेहरूंनी देखील सानंद ती अट स्वीकारली होती. ती व्यक्ती होती यशवंतरावांच्या धर्मपत्नी वेणूताई चव्हाण होय.

धर्मपत्नींची घेतली होती परवानगी :हिमालयावर संकट आले तर महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या संरक्षणासाठी धावून जाईल, असे विधान यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1960 रोजीच्या भाषणात केले होते. त्यानंतर दोनच वर्षात 1962 ला चीनने भारतावर आक्रमण केले. देशापुढे मोठे आव्हान होते. या अभूतपूर्व परिस्थितीत संरक्षण खात्यावर मोठी जबाबदारी आली होती. 6 नोव्हेंबर 1952 रोजी पंडित नेहरूंनी फोन करून आपण संरक्षण खात्याचा पदभार स्वीकारावा, अशी इच्छा यशवंतरावांना कळविली. माझी इच्छा तूर्त कोणास सांगू नका, असे नेहरू म्हणाले. नेहरूंच्या सूचनेवर यशवंतरावांनी आपली धर्मपत्नी वेणूताईंच्या संमतीची अट त्यांच्यासमोर ठेवली. नेहरूंनी यशवंतरावांची ही अट सानंद स्वीकारली. संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी घेण्यापुर्वी धर्मपत्नीची परवानी घेणारे यशवंतराव चव्हाण हे देशातील एकमेव राजकारणी असावेत.

चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण यांनी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवून एक विक्रम केला. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, शेती, उद्योग, सहकार आणि लोकशाहीयुक्त पंचायत राज मुळे महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून गेला. भारतातील सर्वात मोठे आणि प्रगत राज्य, अशी खुद्द पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पावती मिळाली.

सत्तासंघर्षावर यशस्वी मात :यशवंतराव चव्हाण प्रथम 1946 साली आमदार म्हणून निवडून आले. 1946 ते 1958 हा कालखंड भाषावार प्रांतरचना, स्वतंत्र विदर्भाची मागणी, स्वतंत्र मुंबईचा प्रश्न, विशाल द्वैभाषिक राज्य, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, आंदोलन, परस्पर समज, गैरसमज आणि निर्भर्त्सनेला त्यांना तोंड द्यावे लागले. विलक्षण कसोटीच्या काळावर देखील त्यांनी मात केली. राजकीय आपत्तीवर आपत्ती आल्या. त्या काळातील यातनांना त्यांनी तोंड दिले होते.

वेणूताईंना भावनिक पत्र : यशवंतराव चव्हाण यांनी वेणूताईंना एक भावनिक पत्र लिहिले होते. सर्व संकटांना तू ध्यैर्याने तोंड दिलेस आणि माझी हिंमत वाढवलीस. त्यामुळे पुन्हा नव्या आशेने पुढे जाऊ शकलो. 1952 ते 1955 च्या कठीण राजकीय काळातही तू माझी खरी सोबतीण म्हणून साथ केलीस. कठीण काळात माझ्या सल्लागाराचे व जिवाभावांच्या मित्रांचे कार्य केलेस. तुझ्या निरागस सोबतीशिवाय मी निरर्थक व्यक्ती ठरण्याचा संभव आहे. माझ्या वाढत्या जबाबदारीबरोबर तुझी वाढती साथ नसेल तर माझे आयुष्य अर्थशून्य गोष्ट बनेल, अशा भावना त्यांनी वेणूताईंबद्दल व्यक्त केल्या होत्या.

हेही वाचा : Modi invited in kapil sharma show : कपिल शर्मा शोमध्ये पीएम मोदींना आमंत्रण; म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details