महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष : HBD Irwin Bridge : सांगलीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार, 91 वर्षे महापुराचा सामना करणारा 'आयर्विन'

कृष्णा नदी उत्तरेकडून दक्षिणेस वाहत जाते. या नदीवर सांगली शहराजवळ ९१ वा वाढदिवस साजरा करत असलेला आयर्विन ब्रीज आहे. गेल्या ९१ वर्षांत या ब्रीजवर कधी पाणी आलं नाही किंवा हा पूल पाण्याखाली गेला नाही. सांगलीच्या सांस्कृतिक जडणघडणीत व विकासात ऐतिहासिक साक्षीदार ठरलेल्या आयर्विन पुलाचा आज ९१ वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त ईटीव्ही भारतचा खास वृत्तांत...

By

Published : Nov 18, 2020, 5:40 PM IST

Updated : Nov 18, 2020, 6:31 PM IST

HBD Irwin Bridge
सांगलीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार आयर्विन पूल

सांगली - कृष्णाकाठावर वसलेल्या सांगली नगरीला 'आयर्विन' पूल हा ऐतिहासिक ठेवा म्हणून लाभला आहे. शहराच्या जडणघडणीत व विकासात ऐतिहासिक साक्षीदार ठरलेल्या आयर्विन पुलाल 91 वर्षे पूर्ण होत आहेत. वास्तूकलेचा अदभुत आविष्कार असणारा आयर्विन पूल आजही मोठया दिमाखात सांगलीच्या वैभवामध्ये भर घालण्याचे काम करत आहे.

92 वर्षात "आयर्विन" करतोय पदार्पण -

"सांगली बहू परिस चांगली" अशी बिरुदावली सांगलीच्या बाबतीत मिरवली जाते. कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या सांगली शहराची ओळख आज अनेक कारणांनी आहे, मग ती इथल्या हळद, द्राक्ष, नाट्य, साहित्य, कुस्ती, राजकारण असो किंवा अन्य गोष्टी. हे सर्व समृद्ध बनवण्यात सांगलीच्या कृष्णा नदीच्या बरोबर "आयर्विन"पुलाचेही मोठे योगदान आहे. कारण या सर्वांचा राजमार्ग हा आयर्विन पूल राहिला आहे. असा हा वास्तूकलेचा अद्भूत आविष्कार असणारा "आयर्विन" पूल 18 नोव्हेंबर 1929 मध्ये बांधून उभा राहिला. आज या पुलाला 91 वर्ष पूर्ण होत असून 92 व्या वर्षात सांगलीचा "आयर्विन" पूल आता पदार्पण करत आहे.

सांगलीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार आयर्विन पूल
कोल्हापूर मार्गे करावा लागत असे मुंबई-पुणे प्रवास -1929 आधी सांगली शहराला पुणे, मुंबईकडे जाण्याचा मार्ग हा व्हाया कोल्हापूर असा होता. कारण कृष्णा नदीवर कोणताच पूल नव्हता. त्यामुळे सांगलीतून मुंबई आणि पुणेकडे जायचे झाले तर कृष्णा नदीतून नावेच्या माध्यमातून जीव धोक्यात घालून पार करावी लागत असे. त्यामुळे बहुतांश सांगलीच्या जनतेचा प्रवास हा 1929 च्या आधी कोल्हापूर मार्गे होत असे.
सांगलीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार आयर्विन पूल
..आणि महापुरामुळे आयर्विन पुलाचा झाला जन्म -मात्र कृष्णाकाठी वसलेल्या या शहराला 1914 मध्ये महापुराचा फटका बसला आणि त्यानंतर सांगलीचे संस्थानिक पटवर्धन सरकारांनी कृष्णा नदीवर पूल उभारण्याचा निर्णय घेतला. अनेक बाबतीत त्यावेळच्या सांगली स्टेट असेंम्बलीमध्ये यावर चर्चा होऊन निधी जमवून या पूल उभारणीला 14 फेब्रुवारी 1927 मध्ये प्रत्यक्ष सुरवात झाली.6 लाख 50 हजारात उभा झाला पूल -

ब्रिटिश आधिपत्याखाली जरी या पुलाला मान्यता मिळाली असली तरी, याचे सर्व नियंत्रण हे तत्कालीन सांगली संस्थानचे पटवर्धन सरकारांच्या आधिपत्याखाली होतं. तर या पुलाचे बांधकामाचे कंत्राट पुण्यातील रानडे अॅण्ड सन्स कंपनीकडे होता. सांगली शहरातील काळा दगड, कर्नाटकातील गोकाक येथील लाल दगड, शिसे यांचा वापर करून हा पूल बांधण्यात आला. हा पूल उभारताना यावर रेखीव आणि देखण्या रुपाची हस्तकलाही करण्यात आली. 13 कमानींच्या जोरावर उभा राहिलेला हा भव्य-दिव्य पूल अखेर दोन वर्षांनी 18 नोव्हेंबर 1929 मध्ये सर्वार्थाने पूर्ण झाला. त्याकाळी या पुलाला 6 लाख 50 हजार रुपये इतका एकूण खर्च आला.

सांगलीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार आयर्विन पूल
पुलाला "आयर्विन" नाव कसे पडले ?या पुलाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झाले ते भारताचे ब्रिटिश राजवटीतील गव्हर्नर एडवर्ड फ्रेडरिक लेंडीली वुड आणि त्यांना बॅरेन आयर्विन ऑफ कर्बी अंडरडेल ही पदवी होती. या पदवीवरून सांगली संस्थानकडून या पुलाला "आयर्विन" हे नाव देण्यात आले. पटवर्धन संस्थानिकांनी मोठ्या थाटामाटात या पुलाचे उद्घाटन तत्कालीन गव्हर्नर एडवर्ड फ्रेडरिक लेंडीली वुड आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते केलं. एडवर्ड फ्रेडरिक लेंडीली वुड यांच्या पत्नीने या सुंदर पुलाचे तोंड भरून कौतुक केल्याचा इतिहास आहे.आयर्विन ठरला सांगलीच्या समृद्धीचा राजमार्ग -आयर्विन पुलाच्या निर्मितीमुळे खरंतर सांगलीच्या प्रगतीचा मार्ग खुला झाला. पुलाच्या आधी याठिकाणी व्यापारास मर्यादा होत्या. पण आयर्विन पुलाच्या निर्मितीमुळे सांगलीकडे व्यापाराचा नवा मार्ग सुरू झाला आणि बघता बघता सांगली हे एक व्यापारी केंद्र बनले. सांगलीला एक समृद्ध शहर बनवण्याचा "आयर्विन" पूल हा राजमार्ग ठरला.91 व्या वर्षातही दिमाखात उभा आहे,आयर्विन..आज मोठ्या दिमाखात सांगलीच्या वैभवात भर घालणाऱ्या या आयर्विन पुलाला 91 वर्ष पूर्ण झाली आहेत. 90 वर्षाच्या कालखंडात या पुलाने अनेक स्थितंतरे पहिली आहेत. इतकेच नव्हे तर अनेक महापूर पचवली आहेत. नुकत्याच 2019 मध्ये आलेल्या भयानक महापुरालाही आयर्विन पुलाने तोंड दिले आहे, पण या महापुरात पुलाची थोडी वाताहत झाली आहे. पण वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत आलेल्या महापुरात कधीही हा पूल बुडाला नाही किंवा या पुलावरून पाणी गेले नाही. असा हा आयर्विन पूल अनेक संकटे झेलत सांगलीच्या कृष्णाकाठी मोठ्या दिमाखाने उभा आहे.ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा..सांगलीच्या वैभवात भर घालणार आयर्विन पूल आहे. असा हा पूल सांगली शहराच्या जडणघडणीचा साक्षीदार सुद्धा बनला आहे. त्यामुळे समृद्ध करणाऱ्या सांगलीच्या या आयर्विन पुलाचे जतन करण्यासाठी शासनाने प्रयत्न करण्याची गरज सांगलीकर नागरीकांकडून होत आहे.
Last Updated : Nov 18, 2020, 6:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details