रत्नागिरी- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दरम्यान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानेही या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पक्षनिरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत.
रत्नागिरीतील ५ तालुक्यांत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून पक्षनिरीक्षकांची नेमणूक
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील ५ तालुक्यांत पक्ष निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून पक्षनिरीक्षकांची नेमणूक
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील ५ तालुक्यांत पक्ष निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चिपळूणसाठी योगेंद्र सावंत, संगमेश्वरसाठी वैभव रसाळ, रत्नागिरीसाठी मुन्ना खामकर, लांजासाठी दीपक बेंद्रे तर राजापूरसाठी सचिन माजळकर यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.