महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीतील ५ तालुक्यांत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून पक्षनिरीक्षकांची नेमणूक

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील ५ तालुक्यांत पक्ष निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत

By

Published : Mar 24, 2019, 1:06 PM IST

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून पक्षनिरीक्षकांची नेमणूक

रत्नागिरी- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दरम्यान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानेही या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पक्षनिरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून पक्षनिरीक्षकांची नेमणूक

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील ५ तालुक्यांत पक्ष निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चिपळूणसाठी योगेंद्र सावंत, संगमेश्वरसाठी वैभव रसाळ, रत्नागिरीसाठी मुन्ना खामकर, लांजासाठी दीपक बेंद्रे तर राजापूरसाठी सचिन माजळकर यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details